शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

हत्ती दिन विशेष! हत्ती पूर्वी १२० वर्षे जगायचा, आता जगतो ८० वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 3:47 PM

खाल्लेले गवत दुसऱ्या दिवशी ‘हत्ती’च्या तोंडात जशाला तसेच राहते!‘ऐने अकबरी’त मनोरंजक गोष्टी

श्रीकिशन काळे

पुणे : हत्ती हा धिप्पाड आहे. तो अतिशय संवेदनशील आहे. माणसाला ज्या भावना असतात, त्याच त्यालाही असतात. माणसासारखे तो १२० वर्षांपर्यंत जगू शकतो; परंतु हे आयुष्यमान हत्तीला अकबर बादशाहच्या काळात होते. आता हत्तीचे वय साधारण ८० च्या जवळपास आहे. २०१७ मध्ये भारतात २७ हजार हत्ती होते. हस्तिदंतासाठी त्यांची हत्या केली जाते. आता ही संख्या अजून कमी झाली असेल. पूर्वी भारतात लाखो हत्तींची संख्या होती. ती आता काही हजारांवर आली आहे.

चारशे वर्षांपूर्वी अकबर बादशहाकडे ५ हजार हत्तींची फौज होती. लढाईसाठी हत्तीचा वापर होत असे. अकबर बादशहाच्या दरबारातील अबुल फजल याने त्यावेळच्या प्राण्यांविषयीच्या गोष्टी ‘ऐने अकबरी’मध्ये नोंद केल्या आहेत. सोळाव्या शतकातील हे वर्णन मनोरंजक तर आहेच; पण ते लिहिणाऱ्याला कसे आणि कुठून प्राप्त झाले, ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.

४१ व्या ऐनमध्ये अकबराचा चरित्रकार अबुल फजल लिहितो की, संगीताचे काही आलाप हत्ती असे काही लक्षात ठेवतो की, संगीताशी परिचित असलेल्या एखाद्या जाणकाराच्याच फक्त लक्षात राहू शकतात ! हत्तीला संगीताच्या सुरांची व तालांची चांगली जाण असते. तो पाय हलवून लयबध्द हालचाली करू शकतो. रणांगणावर असताना हत्ती धनुष्यातून बाण मारू शकतो, बंदूकही चालवू शकतो, जमिनीवर पडलेल्या वस्तू सोंडेने उचलून माहुताकडे देऊ शकतो. खाल्लेले गवत दुसऱ्या दिवशी तोंडाद्वारे बाहेर काढू शकतो आणि ते त्या गवतात कोणताही बदल झालेला नसतो. (गवतावर रासायनिक प्रक्रिया झालेली नसते).

आता भारतात किती हत्ती ?

भारत सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे जाहीर एका अहवालानुसार २०१७ मध्ये भारतात केवळ २७ हजार ३१२ हत्ती होते. गेल्या ५ वर्षांमध्ये त्यात लक्षणीय घट झाली. २०१२ मध्ये ही संख्या ३१,७११ होती.

''हत्ती हा वैभवाचे, संपन्नतेचे लक्षण मानतो. पूर्वी लढाई करण्यासाठी हत्तीचा वापर होत असे. आपल्याकडे आता हत्ती कमीच आहे. हत्ती पोसणे कमी नाही. अकबर बादशाहच्या दरबारातील अबुल फजलने ‘ऐने अकबरी’ हा पारसीमध्ये ग्रंथ लिहिलेला. तो नंतर इंग्रजीत आला आणि मराठीत मी ‘इतिहासातील प्राणिविश्व’ नावाने प्रसिध्द केला. त्यात तेव्हाच्या हत्तीविषयीच्या अनेक मनोरंजक गोष्टी नमूद आहेत. - महेश तेंडुलकर, इतिहास संशोधक व इतिहासातील प्राणिविश्व पुस्तकाचे लेखक''

''हत्तीच्या तोंडात एका बाजुला गवत किंवा पाणी साठवून ठेवता येते. पोटात गेल्यानंतर अनेकदा गवत विष्ठेतून जशाला तसे बाहेर येते. त्यावर रासायनिक प्रक्रिया होत नाही. आता सोंडेतून पाणी बाहेर काढताना पाहता येते. - डॉ. सुचित्रा सूर्यवंशी, पशूवैद्यकीय अधिकारी'' 

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकIndiaभारतforestजंगलenvironmentपर्यावरण