शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

अंमलबजावणीअभावी पर्यावरणाची हानी

By admin | Published: November 26, 2014 12:05 AM

पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्याकडे कायदे आहेत; परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही. पर्यावरणाची जागृती होण्याच्या दृष्टीने ही जागृती झाली पाहिजे.

पुणो : पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्याकडे कायदे आहेत; परंतु त्यांची अंमलबजावणी होत  नाही. पर्यावरणाची जागृती होण्याच्या दृष्टीने ही जागृती झाली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनीही तेवढेच सजग राहून त्याची माहिती घेतली पाहिजे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
‘गंगोत्री’ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘निसर्गस्नेही जीवनशैली’ या कार्यक्र मात ते बोलत होते. संस्थेचे संचालक गणोश जाधव, राजेंद्र आवटे, मकरंद केळकर या वेळी उपस्थित होते.
गाडगीळ म्हणाले, ‘‘आपल्याकडे पर्यावरणीय कायदे आहेत; मात्र नागरिकांना त्याची माहिती नसते. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी नीटपणो होत नाही. महापालिकेकडून पर्यावरण अहवाल जाहीर होत असतात. मात्र, नागरिकांनी स्वत:हून त्याची माहिती करून घेतली पाहिजे. नागरिकांचा पर्यावरणीय कार्यक्रमात सहभाग वाढला, तरच कायद्याची योग्य अंमलबजावणी होईल. आस्ट्रेलियामध्ये ‘सिटझन रिव्हर वॉच’ असा उपक्र म राबविला जातो. त्यामध्ये शहरातील नद्यांची परिस्थिती नागरिकांच्या लक्षात आणून दिली जाते. त्यातून नागरिकांमध्ये जागृती होते. प्रयोगशाळेत नेऊन नागरिकांच्या सहभागातून प्रयोग केले जातात. मात्र, पर्यावरणाचा विषय निघाला, की सध्या पर्यावरणाची हानी होत आहे, विज्ञान-तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा :हास होत आहे, असे बोलले जाते. तेवढेच आपल्याला माहीत असते.’’
 
4विज्ञान आणि वाढत्या लोकसंख्येमुळे केवळ अधोगतीच झाली आहे, असे नाही. त्यामुळे प्रगतीही खूप झाली आहे. मात्र, ही प्रगती पर्यावरणाच्या मुळावर येऊ नये, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शहरातील टिंबर मार्केटवाले फर्निचरसाठी वडाची झाडे सर्रास कापतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकार आणि प्रशासनामध्ये चांगले लोक आहेत; परंतु यंत्रणा नक्कीच सडली आहे. पुण्यात अनेक वेळा नागरिकांनी उत्स्फूर्तपणो टेकडी बचावसारखी आंदोलने केली आहेत. त्याची व्यापकता वाढली पाहिजे. निसर्गामध्ये असणा:या गोष्टींशी आपण जुळवून घ्यायला हवे. 
 
4टेकडय़ांवर गेल्या काही वर्षात विदेशी झाडे लावली जात आहेत. मात्र, या झाडांचा पशू, पक्षी, कीटकांना काहीच फायदा होत नाही. अशा झाडांवर पक्षी घरटी करीत नाहीत. त्यामुळे अशी झाडे लावण्याऐवजी ती काढून त्याजागी देशी झाडे लावावीत.