शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

इथेनॉल निर्मिती ३० ते ३५ कोटी लिटरने वाढणार; मोलॅसेसवरील निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याचा परिणाम

By नितीन चौधरी | Published: January 17, 2024 5:08 PM

सध्याचे साखरेचे उत्पादन बघता साखरेची मागणी, गेल्या वर्षीचा साठा याचा विचार करता पुढील तीन महिने पुरेल एवढी साखर देशभरात उपलब्ध होऊ शकते

पुणे : केंद्र सरकारने सी मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात ६.८७ रुपये प्रति लिटर अशी घसघशीत वाढ केल्याने तसेच मोलॅसेसवरील निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याने इथेनॉल निर्मिती ३० ते ३५ कोटी लिटरने वाढणे अपेक्षित आहे, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे. परिणामी इथेनॉल बंदीमुळे मध्यंतरीच्या काळात झालेल्या नकारात्मक निर्णयामुळे देशातील इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचे प्रमाण १०.५० टक्क्यापर्यंत घसरले होते, ते या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान १२ ते १५ टक्क्यापर्यंत जाईल, असेही महासंघाचे मत आहे.

याबाबत महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, “मोलॅसेसवरील निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याचा सकारात्मक परिणाम कारखानदारीवर होऊन इथेनॉल निर्मिती वाढू शकते. त्यापूर्वी केंद्र सरकारने सिरप व ज्यूसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर निर्बंध आणले होते. मुळात हा निर्णय हंगामापूर्वी घेणे अपेक्षित होते. केंद्र सरकारने त्यानंतर हा निर्णय काही प्रमाणात दुरुस्त केला. मात्र, त्याचा फायदा होताना दिसत नाही. साखर उपलब्धतेत घट होईल अशी केंद्र सरकारला भीती होती. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर देशभरात झालेल्या पावसामुळे साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याचे साखरेचे उत्पादन बघता साखरेची मागणी, गेल्या वर्षीचा साठा याचा विचार करता पुढील तीन महिने पुरेल एवढी साखर देशभरात उपलब्ध होऊ शकते.”

३०५ लाख टनांचा अंदाज

देशात १५ जानेवारीपर्यंत ५०९ साखर कारखान्यांत १ हजार ५६३ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून १४८.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उसाचे गाळप आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने आजपर्यंत आघाडी राखली आहे. या गाळप हंगामाअखेर देशात किमान ३०५.५० लाख टन साखरेचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. यात आणखी ८ ते १० लाख टनांची वाढ होण्याचा अंदाज आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र उत्पादनात आघाडीवर

ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक हे तीन राज्ये देशात आघाडीवर असून त्यात त्यांचे योगदान ७५.८३ टक्के आहे. महाराष्ट्रातील १९७ कारखान्यात ५४८.३९ लाख टन ऊसगाळप झाले असून त्यातून ५१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर उत्तर प्रदेशातील १२० कारखान्यांतून ४६५.६६ लाख टन उसाचे गाळप होऊन ४६.१० लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले. कर्नाटकातील ६९ कारखान्यांतून ३२२.९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून ३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. या तीनही राज्यात ऊस पिकाला परतीच्या पावसामुळे मोठा फायदा झाल्याने साखर उत्पादनात वाढ होताना दिसत आहे.

साखर उताऱ्यात महाराष्ट्र पाचवे

सरासरी साखर उताऱ्यात उत्तर प्रदेश देशात आघाडीवर असून तेथे ९.९० टक्के सरासरी उतारा मिळाला आहे. त्या खालोखाल तेलंगणाचा क्रमांक असून तेथे साखर उतारा ९.७५ टक्के असा आहे. कर्नाटकात साखर उताऱ्याचे प्रमाण ९.६० टक्के असे आहे तर मध्य प्रदेशात साखर उतारा ९.५० टक्के असा आहे. महाराष्ट्रात साखर उतारा ९.३० टक्के असून वाढत्या थंडीने याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गुजरात, बिहार, हरयाणा आणि उत्तराखंडमध्ये साखर उताऱ्याचे प्रमाण प्रत्येकी सरासरी ९.२० टक्के असे आहे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसGovernmentसरकारMONEYपैसा