शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कुणी व्यंगात्मक बोलले, तरी दम भरला जातोय! आम्ही अस्वस्थपणे बघत राहणार का? डॉ. बाबा आढावांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:29 IST

भारतातील लोकशाही केवळ चार माणसे जिवंत ठेवू शकणार नाहीत, तर सामान्य माणसाचा सहभाग देखील वाढला पाहिजे

पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण, कुणी व्यंगात्मक बोलले तरी दम भरला जातोय. आम्ही केवळ हे अस्वस्थपणे बघत राहणार आहोत का, आता भारतातील लोकशाही केवळ चार माणसे जिवंत ठेवू शकणार नाहीत, तर सामान्य माणसाचा सहभाग देखील वाढला पाहिजे आणि त्याची सुरुवात झाली आहे, असे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले. माणसाची वृत्ती ही विचार व बदल घडविण्याची आहे. पण माणसांना मारायचा प्रकार चालू आहे. लोकशाही नैतिक मूल्यांची बूज राखायला हवी याचे भान सुटले आहे, असेही ते म्हणाले.

थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना यांच्यातर्फे भाई वैद्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हा पुरस्कार लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांना देण्यात आला. मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे त्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, भाई वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य, फाउंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते.

लक्ष्मीकांत देशमुख यांनी विचार मांडले. सत्कारमूर्ती डॉ. तारा भवाळकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. समाजवादी विचार ही एक जीवनसरणी आहे. ती नुसती राजकीय विचारधारा नसून, तो एक जीवन प्रवाह आहे, असे सांगून डॉ. भवाळकर म्हणाल्या, सत्ताधारी आपली सत्ता टिकवण्यासाठी धर्माचा आधार घेतात आणि हे फक्त भारतातच नाही, तर जगामधल्या अनेक देशांमध्ये आता हा एक प्रवाह येतो आहे, असे आपल्याला दिसून येईल. धर्माच्या पाठीमागे लोक जातात आणि धार्मिक गोष्टींच्या मागे जातात असे म्हटले की, बाकीच्या सगळ्या जीवनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष होते, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावCentral Governmentकेंद्र सरकारMahayutiमहायुतीPoliticsराजकारणIndiaभारतBJPभाजपा