शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सहामाही आली, तरी आरटीई प्रवेश सुरु

By admin | Published: October 12, 2016 2:32 AM

शाळांमधील प्रवेशित झालेल्या काही विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा सुरू झाली असून, काहींची परीक्षा आठवड्याभरात सुरू होणार आहे; मात्र

पुणे : शाळांमधील प्रवेशित झालेल्या काही विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा सुरू झाली असून, काहींची परीक्षा आठवड्याभरात सुरू होणार आहे; मात्र तरीही शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशप्रकिया अद्याप पूर्ण झालेली नाही. आरटीई प्रवेशापासून वंचित असलेल्या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. राज्य शासनाकडून आरटीई प्रवेशाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातच आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने प्रवेशअर्ज करूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. शिक्षण विभागाकडूनही प्रवेशाच्या फेऱ्या घेण्याबाबत अनास्था दाखविली जाते. दरम्यानच्या काळात बहुतेक शाळा सुरू होत असल्याने आरटीई प्रवेशाचा विचार न करता, पालक मिळेल त्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेऊन देतात. यंदाही प्रवेशप्रक्रिया धिम्या गतीने राबविण्यात आली. त्यामुळे सहामाही परीक्षा सुरू झाल्यानंतरही, शिक्षण विभागाला आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवावी लागत आहे.विद्यार्थ्यांना पुढील आठ वर्षे मोफत शिक्षण मिळावे म्हणून आॅक्टोबर महिन्यातही प्रवेशपरीक्षा राबविली जात असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. आता प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. शाळा बदलून हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या फेरीसाठी अर्ज करता येईल.(प्रतिनिधी)...तर अर्ज बाद करणार४जिल्ह्यातील ७८० शाळांमध्ये आरटीई प्रवेश राबविले जातात. त्यात २० हजार ५८१ विद्यार्थी प्रवेशास पात्र झाले असून, त्यातील ८ हजार २२२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. रिक्त जागांवर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांचे प्रवेश झाले आहेत, त्यांनी अर्ज करू नये; तसेच दोन किंवा अधिक अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.