शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 01:44 IST

विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे २३ कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे.

वाघोली : विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे २३ कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे. यावेळी झालेल्या सभेत वाघोली ग्रामपंचायतीकडून पुलवामा येथील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. प्रस्तावित करताना सरपंच वसुधंरा उबाळे यांनी झालेल्या कामाबाबत आणि सुरू असलेल्या कामाबाबतीत माहिती दिली.या कार्यक्रमप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, की १९८१ मध्ये मी बारामतीचा खासदार असताना वाघोली बारामती मतदारसंघात होती. त्यावेळेसच्या वाघोलीची लोकसंख्या कमी होती. आता वाघोली लोकसंख्या एका तालुक्याएवढी झालेली आहे. त्यामुळे वाघोली नगरपालिकेत जाणे गरजेचे आहे. गावच्या लोकसंख्येनुसार गावचा विकास होणे गरजेचे आहे.गावचा विकास करताना कचरा, पाणी समस्या, रस्ते यांसारख्या मूलभूत समस्या सोडविण्याची गरज आहे. आता आपण ज्या नदीचे पाणी पितो ते पूर्णपणे दूषित झालेले आहे. त्यावरही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. सगळीकडेच कचरा समस्या ही एक गंबीर समस्या बनत चालली आहे.सगळेच निवडणुका आल्या, की लाखो रुपये खर्च करतात, परंतु नंतर मात्र शांत बसतात. असे न होता सर्वांनी गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. पुढील पिढीचा विचार करता कोणीही काही विरोध करो, पण विमानतळ, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पदेखील गरजेचे आहे.आपल्या परिसरातील विकासाचा वेग असाच ठेवायचा असेल तर चांगल्या विचारांच्या लोकांचा विचार आपल्या सर्वांनी करावा लागेल.>मोदीसरकारफक्त आश्वासनदेणारे सरकारआज या सरकारच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढल्याने तरुण बेरोजगार फिरत आहेत. हे सरकार फक्त आश्वासन देण्याचेच काम करते.एकीकडे अधिवेशनात सहा हजार पोलिसांना इतर सुरक्षा बंदोबस्त मोकळीक देण्यासाठी भाजपा सरकार राज्याचे अधिवेशन थांबवले आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात.>भाजपामध्ये नितीन गडकरींना मदत मिळत नाही,तर सर्वसामान्य माणसाला कशी मदत होणार ?भाजपामध्ये नितीन गडकरीसारख्या माणसाला मदत होत नाही तर सर्वसामान्य माणसाला कोठून मदत होणार, हे सरकार फक्त सुटा-बुटातील सरकार आहे. सरकारने आरक्षणाचे पण पाच वर्षे काहीही केले नाही, आता मात्र काहीतरी केल्याचे दाखवत आहे.शेतकऱ्यांना ५००० वार्षिक म्हणजेच १६ रु.५० रु रोज अनुदान देऊ केले आहे, परंतु आमच्या शेतकऱ्यांना भीक नको आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्या. एकीकडे शेतकºयांना पाच हजार वर्षाला अनुदान देण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये साधूला महिन्याला पाच हजार म्हणजे साठ हजार वर्षाला पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळेच सर्वच विरोधक आता एकत्र आले आहेत. सर्वांना आता हुकूमशाही सरकार नको आहे.या कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार अशोक पवार, विलास लांडे, बापूसाहेब पठारे, रमेश थोरात, माजी जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, वाघोलीच्या सरपंच वसुधंरा उबाळे, उपसरपंच कविता दळवी, पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष शिवदास उबाळे, माजी जि. प. सदस्य रामभाऊ दाभाडे, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार