शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सगळं होत्याचं नव्हतं झालं, आता उभं कसं रहायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:10 AM

पुणे : ५५ वर्षांचे कय्युम कुरेशी सकाळपासून आपल्या जळून खाक झालेल्या दुकानात दर थोड्या वेळाने जात काही हाताशी लागते ...

पुणे : ५५ वर्षांचे कय्युम कुरेशी सकाळपासून आपल्या जळून खाक झालेल्या दुकानात दर थोड्या वेळाने जात काही हाताशी लागते का बघत आहेत. गेली १५ वर्ष ते इथल्या दुकानांत काम करत आहेत. कोरोना टाळेबंदीतून आत्ता कुठे त्यांचा धंदा सावरत होता. शनिवार, रविवारच्या सुट्या आणि सणवार लक्षात घेऊन त्यांनी जास्तीचे सामान खरेदी करून ठेवले होते. घरात दोन जण आजारी...थोडा धंदा होईल आणि त्यातून उपचाराला पैसा हाताशी येईल अशा अपेक्षेने ते या शनिवार-रविवारची वाट पाहात होते. पण तो शनिवार त्यांच्या उरलेल्या आशा आणि अपेक्षा धुळीला मिळवून गेला. रात्री दुकानाला आग लागली आणि सगळेच होत्याचे नव्हते झाले.

कुरेशी म्हणाले, “आमचे काहीच वाचले नाहीये. नव्याने टी-शर्ट आणले होते. आत्ता कुठे आम्ही सावरत होतो. कालच आम्ही लॉकडाऊन लागला तर काय याची भीती व्यक्त केली. होणाऱ्या नुकसानाची भीती खरी ठरली पण ती आगीमुळे. सगळेच गेले. आता उभे कसे राहायचे माहीत नाही.”

कुरेशींसारखीच अवस्था इथल्या जवळपास प्रत्येकाची आहे. दुकानातल्या मालाचे जळालेले तुकडेच आता इथे दुकान होते याची साक्ष सांगताहेत. दुसरे एक व्यापारी म्हणाले, “माझे बेल्टच दुकान आहे. त्याचे आता तुकडेच शिल्लक राहिले आहेत. आठ महिने आमचा काम धंदा बंद होता. आता रमजानमध्ये धंदा होईल म्हणून माल भरला होता. पण आता सगळेच गेले. सरकारने आता या सगळ्या परिस्थीतीकडे बघून काय? चूक काय? बरोबर या वादात न पडता सरळ आम्हाला पुन्हा इथे दुकान चालू करायला मदत करायला हवी. अनेक घर-संसार यावर अवलंबून आहेत.” स्वप्नांची राखरांगोळी झाल्यानंतर येथील अनेकांपुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढे काय?