शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

खोदाई मृत्यूची खाई; ठेकेदारांच्या बेदरकारीला नगरसेवक-प्रशासनाची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:44 IST

शहरातील चित्र : शासकीय अटी व शर्तींचे होतेय सर्रास उल्लंघन

ठळक मुद्दे शासनाच्या आणि पालिकेच्या सुरक्षा मानकांना बसविले धाब्यावर पिंपरी चिंचवडमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’त ने केलेल्या पाहणीमधून वास्तव समोर बेदरकारीमुळे अनेक ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

लक्ष्मण मोरे - पुणे : शहरात जागोजाग सुरू असलेल्या खोदाई आणि रस्त्यांच्या कामांच्या ठिकाणी ठेकेदारांकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. शासनाच्या आणि पालिकेच्या सुरक्षा मानकांना धाब्यावर बसविण्यात येत असून, ठेकेदारांच्या या बेदरकारीला नगरसेवक व प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून अप्रत्यक्षपणे साथच मिळत असल्याचे दिसत आहे. पिंपरी चिंचवडमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीमधून हे वास्तव समोर आले आहे. महापालिकेमार्फत विविध विकासकामे केली जातात. ही कामे करताना खोदाई करावी लागते. विशेषत: जलवाहिन्या, मलनि:स्सारण वाहिन्या टाकताना, महावितरण व खासगी नेटवर्क कंपन्यांच्या केबल्स टाकताना मोठ्या प्रमाणावर खोदाई करावी लागते. कामाच्या ठिकाणी माहिती देणारा फलक लावणे आवश्यक असून, त्यावर खोदाई करणाºया कंपन्याचे नाव, कालावधी, कंपनीचा प्रतिनिधी/अभियंत्याचे नाव, संपर्क व परवानगीचा तपशील, पथ विभागाकडील कनिष्ठ अभियंत्याचे नाव व फोन क्रमांक यांचा उल्लेख करुन ‘खोदाई कामामुळे असुविधा होत असल्याबद्दल क्षमस्व’ असे नमूद करणे अनिवार्य आहे. परंतु, बहुतांश भागांत असे फलक लावल्याचे दिसत नाही. 

आवश्यक त्याठिकाणी पुरेसे सुरक्षारक्षक व वाहतूक नियोजनासाठी वॉर्डन नेमणे, पावसाळी गटार व पाणी जाण्याची ठिकाणे व्यवस्थित आच्छादित करून ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच  नियमांनुसार आठवड्याला कामाच्या प्रगतीचा अहवाल महानगरपालिकेकडे सादर करणे अनिवार्य आहे. परंतु, असे अहवाल पालिकेला कितपत प्राप्त होत असतील, हा संशोधनाचा विषय आहे. या नियमांना राजरोसपणे फाटा दिला जात आहे. खोदाईमधील संपूर्ण माती/राडारोडा वेळेत उचलून नेला जात नाही. त्यामुळे पालिकेचे अधिकारी नेमकी कसली पाहणी करून ठेकेदाराची बिले काढतात, हा प्रश्न आहे.  नकाशांप्रमाणे काम करणे, पाईपलाईन, केबल्स या रस्त्याच्या पृष्ठभागापासून सुरक्षित खोलीवर टाकणे अपेक्षित आहे. परंतु, अनेक ठिकाणी केबल्स वर आलेल्या दिसतात. खबरदारी न बाळगल्याने जलवाहिन्या फुटण्याच्या, विद्युत व गॅसपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. 

* जागोजाग मातीचे ढीग, राडारोडा तसाच रस्त्यावर पडलेला असतो. रस्त्यावरील गर्दीच्या वेळा टाळून इतर वेळी काम करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष करीत काम केले जाते. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. एकदा खोदाई झाली की पुन्हा दुसºया कारणाकरिता काही दिवसांनी पुन्हा त्याच रस्त्यावर खोदाई सुरू केली जाते.  

* सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतली गेल्याने किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अपघातांची जबाबदारी संबंधित कंपनी अथवा ठेकेदाराची आहे सांगून पालिका हात वर करते. परंतु, हे काम सुरू असतानाच ठेकेदारांना सुरक्षा उपाययोजना करायला का सांगितले जात नाही असा प्रश्न आहे. ....खोदाईस सुरुवात करण्यापूर्वी जागेवर तसेच मशिनरीच्या भोवती बॅरिगेट्स व वॉर्निंग टेप, सूचनापाट्या लावणे आणि हा भाग संरक्षित करणे बंधनकारक आहे. रात्री धोका उद्भवू नये यासाठी रेडिअम रिफेलक्टर व सुरक्षाविषयक दिवे खोदाईच्या ठिकाणी लावण्याचा नियम असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे पाहणीमध्ये आढळून आले आहे. हा एक प्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे.

.......

काम करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांची परवानगी घेतली जाणे आवश्यक आहे. परंतु, अनेक ठिकाणी ही परवानगी न घेताच कामे सुरू असतात. वास्तविक वाहतूक पोलिसांना अशा ठेकेदारांवर कारवाई करता येऊ शकते. परंतु, पोलिसांकडूनही ही बेदरकारी गांभीर्याने घेतली जात नाही. ही कामे सुरू असताना वाहतूक वळविण्याकरिता ठेकेदाराने स्वखर्चाने कर्मचारी नेमणे आवश्यक आहे.

अपघातांची जबाबदारी नगरसेवक घेणार का?रस्ते,ड्रेनेज, जलवाहिन्यांची कामे करताना स्थानिक नगरसेवक फ्लेक्स लावून आपल्या निधीमधून हे काम होत असल्याची जाहिरात करतात. परंतु, सुरक्षेच्या उपाययोजना ठेकेदाराने केल्या आहेत की नाही याकडे लक्ष दिले जात नाही. दुर्घटना घडली अथवा अपघात घडला की जबाबदारी घ्यायला कोणीही पुढे येत नाही. प्रशासनही याकडे वेळोवेळी लक्ष देत नाही. ...........पालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी यासंदर्भात एक समिती स्थापन केली होती. आम्ही समिती सदस्यांनी नियमावली तयार करून दिली होती. परंतु, त्याची अंमलबजावणी झालीच झाली. कामांचे श्रेय घ्यायला पुढे येणाºया नगरसेवकांनी अपघातांची जबाबदारीही घ्यायला हवी. प्रशासनाची उदासीनता हा महत्त्वाचा भाग आहेच; परंतु नागरिकही अशा गैरप्रकारांविरुद्ध आवाज का उठवत नाहीत हा प्रश्न आहे. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच........* ठेकेदारांकडून खर्च वाचविण्याकरिता झाडांच्या फांद्या लावणे, लाकडी काठ्यांना लाल कापड बांधून ठेवणे असे जुजबी प्रकार केले जातात. त्यामुळे अशा बेदरकार ठेकेदारांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. पुण्यात अशा बेदरकारीमुळे अनेक ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झालेले आहेत. रस्त्यावरून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला ये-जा करीत असतात. सर्वाधिक धोका त्यांना होऊ शकतो. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका