शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
5
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
6
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
7
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
8
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
9
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
10
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
11
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
12
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
13
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
14
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
15
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
16
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
17
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
18
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
19
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
20
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान

Tanaji Sawant: सरकारी यंत्रणेचा खर्च सावंतांकडून वसूल करावा; पुण्यात राजकीय पक्षांकडून टीकेचा भडिमार

By राजू इनामदार | Updated: February 11, 2025 18:22 IST

अनेक बेपत्ता होणाऱ्या मुलांचा तपास होत नाही, मात्र सावंत प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली चपळाई आश्चर्यकारक आहे

पुणे : कुटुंबातील भांडणावरून न सांगता परदेशात चाललेल्या मुलासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली. या यंत्रणेसाठी झालेला सगळा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राज्य प्रवक्ता सुनील माने यांनी सावंतांवर सरकारची दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. अन्य राजकीय पक्षांकडूनची सावंत यांच्यावर टीका होत आहे.

सावंत यांचा धाकटा मुलगा घरी न सांगता खासगी विमान घेऊन थेट बँकॉकला निघाला होता. त्यावरून सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून मदत मागितली. मुलाचे अपहरण झाल्याची अफवा तोपर्यंत सगळीकडे पसरली. सरकारी यंत्रणेला वरिष्ठांचे आदेश मिळाल्याने त्यांनी त्वरेने बऱ्याच हालचाली केल्या. त्यात तो मुलगा खासगी विमानाने बँकॉकला चालला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बऱ्याच कायदेशीर गोष्टी करून पोलिसांनी ते विमान परत पुण्यात आणले.

सावंत चांगले सुशिक्षित आहेत. मंत्री होते. अशा व्यक्तीला कुटुंबाचे, कुटुंबातील गोष्टींचे थोडे तरी भान असले पाहिजे, असे मत माने यांनी व्यक्त केले. देशात अनेक मुले बेपत्ता होतात, घरांतून निघून जातात, त्यांची साधी पोलिस फिर्यादही घेतली जात नाही. तपास होत नाही. वर्षानुवर्षे ही मुले बेपत्ताच राहतात. सावंत प्रकरणात मात्र पोलिसांनी दाखवलेली चपळाई आश्चर्य करण्यासारखी आहे. त्यामुळे हे सरकार सामान्यांसाठी आहे की फक्त पुढारी, राजकारण्यांसाठी, असा प्रश्न पडला असल्याचे माने म्हणाले.

संजय मोरे यांनीही सावंत यांच्यावर टीका केली. घरच्या भांडणांसाठी सरकारला कामाला लावणाऱ्या सावंत यांच्यावर कारवाई व्हायला हवी, त्यांच्या मुलांसाठी झालेला सरकारचा सगळा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी त्यांनी केली. सामान्यांच्या मुलाबाळांनाही सरकारने अशीच वागणूक द्यावी, त्यांच्यासाठीही अशीच त्वरित हालचाल करावी असे ते म्हणाले.

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, जनतेने पॅनिक बटण दाबले तर साधा पोलिस शिपाईसुद्धा कधी येत नाही. निर्घृण हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचा खुनी दोन महिने झाले तरी पोलिसांना सापडत नाही. इथे मात्र माजी मंत्र्यांच्या घरातून फक्त न सांगता गेलेल्या मुलासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस महासंचालकांपर्यंत सगळे कामाला लागतात. लोकशाही व्यवस्थेची यासारखी दुसरी चेष्टा नाही, असे किर्दत म्हणाले.

समाजमाध्यमांवरही तानाजी सावंत अनेकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. खेकड्यांनी धरणाची भिंत कुरतडली म्हणून ती कोसळली असा विनोदी शोध लावणारे, तो कोण हाफकिन आहे, त्याला बोलावून घ्या, असे म्हणणारे हेच ते महान माजी मंत्री वगैरे टीका सावंत यांच्यावर सुरू आहे. मुलांना सांभाळता येत नाही ते सरकार कसे सांभाळणार? असाही प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेTanaji Sawantतानाजी सावंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीPoliceपोलिस