शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अपघातग्रस्त कुटुंबियांना अखेर मिळाला न्याय : दोन प्रकरणात ५० लाखांवर भरपाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 19:32 IST

मोशी व खडी मशीन चौकात अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना लोक अदालती मध्ये न्याय मिळाला.

पुणे : अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन प्रकरणांमध्ये लोकअदालतमध्ये अखेर न्याय मिळाला. अपघाताच्या दोन्ही प्रकरणांतून त्यांना नुकसानभरपाई दिली आहे. यात एका प्रकरणात २५ लाख, तर, दुसऱ्या प्रकरणात २५ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. पहिले प्रकरण अनिता शंकर पोतदार (वय ३३, रा. चाकण) यांनी अ‍ॅड. कांचन धामणकर यांच्याव्दारे ९ आॅक्टोबर २०१७ रोजी मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. अनिता यांचे पती शंकर गणेशराव पोतदार (वय ४३) हे १९ सप्टेंबर २०१७ रोजी नाशिक-पुणे रस्त्याने चाकणकडून भोसरीकडे दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी मोशी चौकात डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते एका कंपनीत कामाला होते. त्यांना दरमहा १७ हजार रुपये पगार होता. पत्नी, दोन मुले आणि आईचे पालकत्व त्यांच्याकडे होते. या पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या विरोधात दाखल केलेल्या दाव्यात ३० लाख रुपये नुकसानभरपाई मागितली होती. मात्र, २५ लाख रुपये नुकसानभरपाई देत तडजोडीअंती दावा निकाली काढला. विमा कंपनीच्या वतीने अ‍ॅड. हृषीकेश गानू यांनी काम पाहिले. दुसरा दावा सुमित चंद्रकांत शिंदे (वय २६, येवलेवाडी) यांच्या मृत्यूप्रकरणी वडील चंद्रकांत आणि आई शैलजा यांनी अ?ॅड. कांचन धामणकर यांच्यामार्फत दाखल केला होता. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी खडीमशिन चौकात रस्त्याच्या कडेला सुमित उभे राहिले असताना त्यांना डंपरने धडक दिली. २३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांचा उपचाराद रम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ते सक्सेस इन्स्टिट्युट चालवत होते. तसेच नियमित आयकर भरत असत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बजाज अलायन्स कंपनीच्या विरोधात दाखल केलेल्या दाव्यात ३० लाख मागितले होते. लोकअदालतमध्ये २५ लाख ५० हजार रुपये देत हा दावा निकाली काढला.  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयAccidentअपघातFamilyपरिवार