शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘कुटुंब मणिपूरमध्ये..चिंतेनं आम्हाला झोप लागेना’, पुण्यात शिकणाऱ्या मणिपुरी विद्यार्थ्यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 13:04 IST

राज्यकर्त्यांनी स्वत:चा फायदा सोडून लोकांचा विचार करावा

पुणे : मणिपूर तिकडं जळतंय आणि आम्ही इथं पुण्यात आहोत. आमचं सर्व कुटुंब तिथं आहे. त्यांच्या चिंतेने रात्रभर झोप लागत नाही. इथं चूक कोणत्या एका समाजाची आहे असे आम्ही मानत नाही, तर दोन्ही समाजाची चूक आहे. हे सगळं थांबायला हवं. पुन्हा त्या भागात शांतता आणि भाईचारा निर्माण व्हावा, अशी भावना पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मणिपुरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तीन महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घातले असते तर इतकी परिस्थिती चिघळली नसती, असेही ते म्हणाले.

गेल्या सत्तर दिवसांपासून मणिपूरमध्ये संघर्ष पेटला आहे. तिथली परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. मैतई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आल्यानंतर राज्यात हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. नुकताच दोन महिलांचा नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ शहरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने पुण्यात शिक्षण घेत असलेल्या काही मणिपुरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मैतई आणि कुकी समाजात अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची जाणीव कुणालाच नव्हती. अचानक महिलांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

''समाजात अनेकदा गैरसमजुती निर्माण केल्या जातात. आगीत तेल टाकण्याचे काम केले जाते. त्यामुळे दंगली घडतात. सध्या मणिपूरमध्ये जे चालू आहे ते मैतई आणि कुकी समाजामधले वाद आहेत. आमचे कुटुंब त्या भागात राहते. त्यामुळे भीती वाटते. महिलांची नग्न धिंड काढल्याचे कृत्य अतिशय चुकीचे आहे, पण यात चूक दोन्ही समाजाची आहे. एका घटनेमुळे संपूर्ण मैतई समाजाला दोष देणे चुकीचे आहे. मणिपूरमध्ये शांतता नांदावी हीच आमची इच्छा आहे. - मलेन, मणिपुरी विद्यार्थी.''

''सुरुवातीपासूनच मणिपूर राज्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. आत्ता सुरू असलेली परिस्थिती खूप भीतीदायक आहे. मी मणिपूरची रहिवासी आहे. त्यामुळे तिथे सुरू असलेल्या एकंदर घडामोडीबद्दल खूप वाईट वाटते. मणिपूरचा प्रश्न कोणत्या धर्माशी संबंधित नसून मानवतेशी आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी स्वत:चा फायदा सोडून लोकांचा विचार केला पाहिजे. मणिपूरची परिस्थिती लवकर सुधारेल, अशी आशा आम्ही घरातील सगळेच लोक करत आहोत. - सोनिका युमनाम, मणिपूर विद्यार्थिनी.'' 

टॅग्स :PuneपुणेManipur Violenceमणिपूर हिंसाचारStudentविद्यार्थीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी