शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

दौंडच्या दुष्काळी भागात टंचाईच्या झळा!

By admin | Published: April 03, 2015 3:20 AM

शेतीचापाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कोरडे पडलेले ओढे, शेततळी, तलाव, विहिरी आदी पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठला असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागत

खोर : शेतीचापाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कोरडे पडलेले ओढे, शेततळी, तलाव, विहिरी आदी पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठला असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागत आहे. दौंडच्या दुष्काळी पश्चिम पट्टयातील ही स्थिती असून येथील ग्रामस्थ आताच पाणी पाणी करीत आहेत. पाण्याची बचत करण्यासाठी या परिसरातील शेतकरी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून फळबागा जगविण्याची धडपड करीत आहेत. उन्हाळा चालू होण्याच्या आधीच शेतकरी कांदा, रब्बी पिकांचे उत्पादन घेऊन आर्थिक बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्या कांद्याच्या कमी होत असलेल्या बाजारभावामुळे तसेच उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पाण्याची होत असलेली कमतरता पाहता, दौंडच्या दुष्काळी भागामधील शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. दर वर्षी शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती स्तर, जिल्हा परिषद स्तरावर रोजगार हमी योजना, ओढा खोलीकरण, नाला खोलीकरण, ओढ्यावर कोल्हापुरी पद्धतीचे तसेच सिमेंटचे बंधारे बांधून पावसाळ्याच्या कालावधीमधील वाहून जाणारे पाणी आडवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची कामे हाती घेण्याची धडपड सुरू होत असते. या भागातील पडवी, कुसेगाव, माळवाडी, देऊळगावगाडा, नारायणबेट, खोर, वासुंदे, रोटी या गावांचा मार्च-एप्रिल महिन्यापासूनच पाण्याच्या टंचाईला सुरुवात झाली आहे. या भागात कार्यान्वित असलेल्या सिंचन क्षेत्रामधील योजना मात्र शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळताना दिसत आहेत. जनाई-शिरसाई योजना, पुरंदर उपसा जलसिंचन योजना अशा प्रकारच्या सिंचन योजनांकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला गेला, तर या भागामधील उन्हाळाच्या कालावधीमधील होत असलेली पाण्याची समस्या कमी हाईल, अशी अपेक्षा या भागामधील शेतकरीवर्गाची आहे.