शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

Ambadas Danve: सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर, अंबादास दानवे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 1:52 PM

गुजरातमधून राज्यात कापसाचे बनावट बियाणे येत आहे. अशा बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया जातोय

पुणे: गुजरातमधून येणारे बनावट बियाणे, त्याकडे राज्य सरकारचे होत असलेले दुर्लक्ष; तसेच खतांचे लिंकिंग व तुटवडा यामुळे शेतकरी अक्षरश: वाऱ्यावर आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी गुरुवारी (दि. २०) केला. खरीप हंगामासाठी अपेक्षित कर्जपुरवठा होत नसल्याचे सांगत राष्ट्रीयीकृत बँकांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ २० टक्केच कर्जपुरवठा केल्याकडे लक्ष वेधत त्यांनी सहकार विभागाला धारेवर धरले.

दानवे यांनी पुण्यात सहकार आणि कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. सहकार आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विभागाचे आयुक्त रावसाहेब भागडे आदी बैठकीत उपस्थित होते. दानवे म्हणाले, ‘गुजरातमधून राज्यात कापसाचे बनावट बियाणे येत आहे. अशा बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया जात आहे. त्यामुळे अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. विदर्भात पुन्हा आत्महत्या वाढू लागल्या आहेत; पण राज्य सरकारला याचे सोयरसुतक नाही. राज्य सरकार, कृषी विभागाचे अधिकारी आणि खासगी कंपन्यांचे संगनमत असल्यामुळे सर्वकाही बिनभोबाट सुरू आहे.’

निकृष्ट बियाणे, यंत्रे, खते, औषधे शेतकऱ्यांच्या माथी

राज्यात खतांचे लिंकिंग सुरू आहे. युरिया खतासाठी मिश्र किंवा संयुक्त खत घ्यावे लागते. त्यांना विनाउपयोगी जैविक खते घेण्याची सक्ती केली जात आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ जाणीवपूर्वक निष्कृष्ट दर्जाचे बियाणे, यंत्रे, औषधे, जैविक खते शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. राज्यातील सोयाबीन उत्पादक पट्ट्यात डीएपी खताचा मोठा तुटवडा आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येऊ घातले आहे; पण कृषी विभागाला त्याचे देणे-घेणे नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीकाही दानवे यांनी केली.

पीकविम्यापासून हजाराे शेतकरी वंचित

शेतकऱ्यांना होणाऱ्या कर्जवाटपात अद्यापही सी-बिल गुण पाहिले जात आहेत. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेडनेट, हॉलिहाऊस, हरितगृह उभारलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. पीकविम्यापासून अजूनही हजारो शेतकरी वंचित आहेत. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेAmbadas Danweyअंबादास दानवेFarmerशेतकरीPoliticsराजकारणGujaratगुजरातMONEYपैसा