शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

इंदापूर उपसासिंचन योजना राबविण्याची मागणीसाठी शेतकऱ्यांचे सिंचनभवनवर उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 2:17 PM

ग्रामीण भागातील शेतीला उन्हाळी आवर्तन मिळत नसल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे

कळस : खडकवासला धरणसाखळीतील पाण्यावरून पुणे शहर व ग्रामीण भागातील शेतकरी यांच्यात नेहमीच वाद होत आहे. ग्रामीण भागातील शेतीला उन्हाळी आवर्तन मिळत नाही. परिणामी शेती व्यवसाय अडचणीत आला आहे.

त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजनी जलाशयावरुन उपसा जलसिंचन योजना राबविण्याची मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील सिंचन भवनसमोर शुक्रवारी (ता. २३) रोजी शेतकरी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी एका शेतकऱ्यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली.

सकाळी ११ वाजता सिंचन भवन गेटसमोर आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी बाबामहाराज खारतोडे, विजय गावडे,रमेश खारतोडे, निवृत्ती गायकवाड, दादासाहेब खारतोडे आकाश पवार यांची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाणी योजना मंजूर न झाल्यास आंदोलन आक्रमक करण्यात येईल असे सांगितले.

इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या जीवावरील ३६ गावे, सणसर कटच्या माध्यमातून पाणी मिळणारी २२ गावे अशा ६८ गावांतील शेतीसिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या काही वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या जीवावरील शेती व्यवसाय अनियमित आवर्तनामुळे अडचणीत आला आहे. कालव्याच्या पाण्याची शाश्वती राहिली नसल्याने, येथील शेतकरी हतबल झाले आहेत. खडकवासला धरणाच्या मूळ प्रकल्प आराखड्यातील मंजूर पाणी कोटा गेल्या कित्येक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना मिळला नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. यावेळी भाषणे चालु असताना एका युवा शेतकऱ्यानी बाटलीचे टोपण उघडून अंगावर बाटलीतील द्रव ओतून घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagitationआंदोलनSocialसामाजिकGovernmentसरकार