शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

तलाव भरा ! इंदापूर, दौैंड तालुक्यातून मागणी वाढली

By admin | Published: April 21, 2017 5:58 AM

तलावातील लाभक्षेत्रात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीतील ऊस, भाजीपाला, चारापिके आणि फळबागांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

शिर्सुफळ : येथील तलावातील लाभक्षेत्रात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीतील ऊस, भाजीपाला, चारापिके आणि फळबागांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्यावाचून पिके जळू लागली आहेत. हा तलाव खडकवासलातून कालव्यातून भरून घेण्यासठी तलावात पाणी सोडण्याची येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. परिसरातील विंधन विहिरी, विहारी कोरड्या पडल्याने लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिर्सुफळ गावची यात्रा सुरू होत आहे. शिर्सुफळ येथील शिरसाई यात्रेसाठी आजूबाजूच्या परिसरातील भाविकभक्त हजारोंच्या संख्येने शिरसाई देवीचा नवस फेडण्यासाठी येत असतात. त्यामुळे पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते. पाणी सोडण्याची मागणी शिर्सुफळ ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल हिवरकर, आप्पासाहेब आटोळे, बारामती दूध संघाचे संचालक नितीन आटोळे, विश्वास आटोळे व शिर्सुफळ येथील ग्रामस्थांची मागणी आहे.(वार्ताहर) राहू : टँकर मिळेना, तलावात पुरंदर उपसा योजनेचे पाणी तरी सोडा, अशी कळकळीची विनंती दौंड तालुक्यातील ताह्मणवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे. पाणी तलावात सोडले तर पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हा परिसर गेल्या कित्येक वर्षांपासून तहानलेलाच असतो. ऐन उन्हाळ्यात तर टँकरने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसाबसा सोडवला जातो. यावर्षी अद्याप पिण्याच्या पाण्यासाठी टँकरही मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत दौंडचे गटविकास अधिकारी संतोष हराळे म्हणाले, की ताह्मणवाडी येथील पिण्याच्या पाण्याबाबतचा टँकरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. त्याबाबत कार्यवाही होऊन लवकरच येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल. दौंड पंचायत समितीचे उपसभापती सुशांत दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता, येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. लवकरच येथे टँकर दिला जाईल. पुरंदर उपसा योजनेचे पाणी ताह्मणवाडी तलावात सोडण्यासाठी साधारणता दोन कोटी रुपय खर्च अपेक्षित आहे. यासाठी पाटबंधारे खात्याने अंदाजित आराखडा काही वर्षांपूर्वी तयार केला आहे. परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही. (वार्ताहर)