शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चित्रपट पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकाला वाचावा लागतो शब्दांच्या आत दडलेला मजकूर - सुभाष घई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 20:56 IST

चित्रपटाची पटकथा हे निव्वळ कागद असतात. चित्रपट पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकाला शब्दांच्या आत दडलेला मजकूर वाचावा लागतो. तो त्या चित्रपटाचे एक कल्पनाविश्व तयार करतो.ती  कथा कशा पद्धतीने मांडायची आहे याचे आराखडे विचारातून पक्के बांधतो. मग त्याला अनुसरूनच पात्रांची निवड करतो.

पुणे - चित्रपटाची पटकथा हे निव्वळ कागद असतात. चित्रपट पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकाला शब्दांच्या आत दडलेला मजकूर वाचावा लागतो. तो त्या चित्रपटाचे एक कल्पनाविश्व तयार करतो.ती  कथा कशा पद्धतीने मांडायची आहे याचे आराखडे विचारातून पक्के बांधतो. मग त्याला अनुसरूनच पात्रांची निवड करतो. अनेक प्रथितयश दिग्दर्शकांनी हेच केले, त्यातीलच एक नाव म्हणजे राज कपूर. गंभीर सामाजिक मूल्य असलेले विषयही त्यांनी वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर ठेवले.‘समझनेवाले समझ गए ना समझे वो अनाडी है’....अशा शब्दातं ’हिरो,‘कर्ज’, ‘खलनायक’ यांसारख्या चित्रपटांमधूनच स्वत:ची वेगळी छाप सोडणारा एक ‘शोमॅन’ भारतीय चित्रपटसृष्टीमधील ‘शोमॅन’ चे दिग्दर्शकीय पैलू उलगडत होता. मला ‘शोमॅन’ म्हणणं खूप संकोचल्यासारखं वाटतं, अशी प्रांजळ कबुली देत प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी आपल्या मोठेपणाचे दर्शन घडविले.पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत ‘पिफ फोरम’ मध्ये सुभाष घई यांच्याशी डॉ. जब्बार पटेल यांनी ‘ राज कपूर आणि त्यांचे चित्रपट’याविषयावर संवाद साधला. महाविद्यालयीन जीवनातही आम्ही मित्रमंडळी चित्रपटांबददल चर्चा करायचो. विशिष्ट  दिग्दर्शक कोणत्या दृष्टीकोनातून चित्रपट बनवितो, विशेषत: राज कपूर यांच्या दिग्दर्शकीय कौशल्यांवर आम्ही बोलायचो, असे सांगून घई म्हणाले,  राज कपूर यांची व्याख्या करणे अतिशय अवघड आहे. ते आपल्या चित्रपटांमधून गरिबी, सामाजिक विषमता अशा गंभीर विषयांवर भाष्य करायचे,पण हे मांडताना प्रेक्षकांचे ते मनोरंजनही करायचे. त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक पापुद्रे असायचे. जे सहजासहजी लक्षात येणे सोपेनाही. हे पापुद्रे उलगडून त्यांना समजून घ्यायला हवे. जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी ते एक होते.  त्यांना काव्य आणि संगीताविषयी कमालीचा आदर होता. संगीत, नाटक व नृत्य यांचे एकत्रीकरण त्यांच्यासारखे फार कमी दिग्दर्शक करू शकले.  प्रत्येक माणसात एक हदयअसते आणि प्रत्येक हदयात एक माणूस असतो, असे सांगणारे राज कपूर तत्त्ववेत्तेही होते. ते केवळ मनोरंजन करायचे नाहीत, तर एक साधा माणूस त्यांनी पडद्यावर उभा केला. गांजलेल्या माणसांच्या गोष्टी सांगणारा ते ’जोकर’ झाले.’ राजू’  ही व्यक्तिरेखा केवळ तेच करू शकतात...गुरू राज कपूर यांच्याबददल शिष्यत्वाच्या भूमिकेतून घई भरभरून बोलत होते. माझ्या मते ‘मेरा नाम जोकर’ हा राज कपूर यांचा सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे, तर अभिनेते म्हणून ‘अंदाज’  हा चित्रपट मला सर्वोत्कृष्ट वाटतो असेही ते म्हणाले. मानधन न विचारता  ‘खानदोस्त’ ला दिला होकार... राज कपूर हे माझ्यासाठी  ‘आयडॉल’ होते. लहानपणापासून मी त्यांचे चित्रपट पाहात आलो.  मी ‘खान दोस्त’ हा चित्रपट लिहिला. तेव्हा शत्रुघ्न सिन्हाबरोबर एक निरागस शिपाई मला हवा होता. ही भूमिका त्यांनी करावी अशी माझी इच्छा होती. त्यांनी पटकथा वाचली आणि तारखा किंवा मानधन याविषयी काहीही न विचारता लगेच  होकार दिला. माझे एखादे काम आवडले तर ते आवर्जून दूरध्वनी करून कौतुक करायचे....त्यांच्या चित्रपटांचे मी निरीक्षण करायचो. त्यांचा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान असल्याची भावना घई यांनीव्यक्त केली.

टॅग्स :entertainmentकरमणूकPuneपुणे