शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
2
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
3
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
4
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
5
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
6
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
7
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
8
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
9
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
10
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
11
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
12
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
13
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
14
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
15
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
16
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
17
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
18
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
19
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
20
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता

‘स्मार्ट सिटी’ आराखडा अंतिम टप्प्यात

By admin | Published: November 22, 2015 3:40 AM

केंद्र शासनाकडे पाठवायच्या ‘स्मार्ट सिटी’ आराखड्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच तो पूर्णत्वास जाईल. पुणेकर नागरिकांकडून तीन टप्प्यांमध्ये त्यांची मते, सूचना

पुणे : केंद्र शासनाकडे पाठवायच्या ‘स्मार्ट सिटी’ आराखड्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच तो पूर्णत्वास जाईल. पुणेकर नागरिकांकडून तीन टप्प्यांमध्ये त्यांची मते, सूचना, शिफारशी जाणून घेऊन त्यांचा या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा केंद्र शासनाकडे १५ डिसेंबरपर्यंत पाठविला जाणार आहे.केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी योजने’तील १०० शहरांमध्ये पुणे शहराची निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्यातून २० शहरांची निवड होणार आहे. त्याकरिता या १०० महापालिकांना आराखडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यातून स्पर्धा होऊन, २० शहरांची निवड होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये समावेशासाठी राज्यातून पुणे शहराची दावेदारी भक्कम मानली जात आहे. ‘स्मार्ट सिटी’चा आराखडा बनविताना पुणे महापालिकेने सुरुवातीपासून नागरिकांच्या सहभागावर भर दिला आहे. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत विकसित करण्यासाठी ‘मॉडेल एरिया’ म्हणून औंध-बाणेर भागाची निवड केली आहे. ‘स्मार्ट सिटी प्रदर्शना’मध्ये सहभागी होण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी तिथे पाहिलेल्या काही निवडक प्रकल्पांचाही समावेश ‘स्मार्ट सिटी’ आराखड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. ‘स्मार्ट सिटी योजने’मध्ये शहरांची निवड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षकांना निमंत्रित केले जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल, असाच आराखडा तयार करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.आता पुणेकरांचा ‘स्मार्ट सिटी योजने’साठी पाठिंबा दर्शविणारी प्रतिज्ञापत्रे भरून घेतली जाणार आहेत. येत्या २५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. शहराच्या समस्या सोडविण्यासाठी संपूर्ण देशासमोर आदर्श उदाहरण घालून देऊ, अशी प्रतिज्ञेचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.