शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
3
T20 WC 2024 : रोहित शर्मानं जे केलं तेच आम्हीही करू; हरमनप्रीत कौरनं सांगितलं टीम इंडियाचं ध्येय
4
'ये लडकियां ना-महरम...'! पाकिस्तानात व्यासपीठावरून का निघून गेला झाकीर नाईक? मागे धावताना दिसले अधिकारी
5
'सिकंदर' सलमान खानचं 'किक' फोटोशूट! भाईजानने हटके पद्धतीने केली 'Kick 2'ची घोषणा
6
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
7
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
8
'बाप-लेकी'च्या भेटीवर हसीन जहाँची तिखट प्रतिक्रिया; शमीवर आरोप करत म्हणाली...
9
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
10
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
11
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
12
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
13
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
14
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
15
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
16
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
17
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
18
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
19
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
20
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत

कोथिंबीर शेतकऱ्याकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला एकच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:13 AM

(स्टार १०९४ डमी) पुणे : भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात गडगडले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरात फारसा काही फरक पडलेला ...

(स्टार १०९४ डमी)

पुणे : भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात गडगडले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरात फारसा काही फरक पडलेला नाही. स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात तर सलग दोन दिवस सुटी आल्याने भाजीपाल्याचे दर निम्म्याने घटले होते. उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांना तर प्रचंड तोटा सहन करावा लागला.

एखादे पीक शेतकरी ३ ते ६ महिने किंवा ९ महिन्यांच्या कालावधीत घेत असतो. या काळात खुरपणी, खत, पाणी, वाहतूक आदी कारणांसाठी त्याचा भरमसाठ खर्च होत असतो. जेव्हा तो माल बाजारात विक्रीला घेऊन येतो. तेव्हा त्याच्याकडून किरकोळ व्यापारी कवडीमोल भावात खरेदी करतात. त्यात त्याचा उत्पादन किंवा वाहतूक खर्चही निघत नाही. त्यामुळे त्याच्या परिस्थितीत कोणताही बदल होत नाही. याउलट व्यापारी मात्र, दुप्पट-चौपट दराने ग्राहकांना विक्री करतात. त्यामुळे ही परिस्थिती कधी बदलणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. तसेच हमीभावाची देखील मागणी करत आहेत.

------

* कोणत्या भाजीला काय भाव

भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव

वांगी १२-१६ ४०

टोमॅटो २-४ २०

भेंडी १२-१६ ४०

चवळी १२-१६ ४०

पालक ४-६ १०

कोथिंबीर २-४ १०

मेथी ४-६ १०

हिरवी मिरची १५-२० ५०-६०

पत्ताकोबी ३-४ २०

फूलकोबी १०-१२ ४०

दोडके ८-१० ४०

-------

* शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

१) कोथिंबीर लावली होती. तीन-चार महिन्याचा उत्पादन खर्च खूप होता. जेव्हा मार्केट यार्डात विक्रीसाठी आणली तेव्हा एका गड्डीला २ ते ४ रुपये दर मिळाला. त्यामुळे कोथिंबिरीचा उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघाला नाही.

- संजय कदम, शेतकरी

----

२) दोन एकरांत कोबी लावली होती. मात्र, यंदा बाजारात कोबीला भावच नाही. पहिल्या तोड्याच्या वेळी बाजारा कोबी विक्रीला नेली. तेव्हा वाहतूक खर्चही पदरचा करावा लागला. त्यामुळे दोन एकरातील कोबी जनावरांना सोडली.

- शहाजी थोरात, शेतकरी

-----

* ग्राहकांना परवडेना...

शेतकऱ्यांकडून मार्केट यार्डातील बाजारात किरकोळ विक्रेत हे कवडीमोल भावात मालाची खरेदी करतात. मात्र, इतर ठिकाणी हे व्यापारी तिप्पट-चौपट दराने ग्राहकांना विक्री करत आहेत. होलसेल बाजारात शेतकऱ्यांकडून ३ ते ४ रुपये किलोने पत्ताकोबी घेऊन ती पुढे किरकोळमध्ये २० ते २५ रुपये किलोने किरकोळ व्यापारी विकत आहेत. आर्थिकदृष्ट्या ते आम्हाला परवडत नाही. त्यामुळे आम्ही सध्या भाजीपाला घेतच नाही.

- संगीता पठारे, ग्राहक

-----

* भावात एवढा फरक का?

मार्केट यार्डातून ३ रुपयाला १०० मेथीच्या जुडी घेतल्यावर त्या आणण्यासाठी वाहतूक खर्च लागतो. तसेच घेतलेल्या १०० जुड्यांमध्ये १० ते १५ जुड्या खराब निघतात. त्याचा खर्च भरून काढण्यासाठी आम्हाला साहजिकच दर वाढवावे लागतात. आमचा तो खर्च आणि काही प्रमाणात नफा या दृष्टीने आम्हाला दर वाढवावेच लागतात.

- हिरामण आल्हाट, किरकोळ व्यापारी