शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

तरंगती लोकसंख्या मोजण्याचा फॉर्म्युलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:49 IST

नोंदणीच होत नाही : ५ लाखांपेक्षा जास्त असल्याचा दावा

राजू इनामदार

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे महापालिका वॉटर बजेट तयार करत आहे. मात्र, लोकसंख्येची सर्वसाधारण आकडेवारी मिळत असली तरी तरंगती लोकसंख्या (शिक्षण, काम, नोकरी यानिमित्ताने शहरात येणारा जाणारा वर्ग) मोजण्याचे कसलेही साधन किंवा फॉर्म्युलाही जनगणना कार्यालयाकडे नाही. त्यामुळे पाण्याचा कोटा वाढवून घेताना या एका मुद्द्यावर पालिकेची अडचण होणार आहे.

प्राधिकरणाने महापालिकेला येत्या तीन महिन्यांमध्ये वॉटर बजेट तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी महापालिकेला पाण्याचा सविस्तर अहवालच तयार करावा लागणार आहे. त्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. सर्वसाधारण निवासी लोकसंख्येची आकडेवारी जनगणना कार्यालयाकडून उपलब्ध होते. त्यात आसपासच्या गावांच्या लोकसंख्येचाही समावेश आहे. मात्र त्याशिवाय तरंगती लोकसंख्या हाही एक महत्त्वाचा मुद्दा त्यात आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार शहरात किमान ५ लाख लोक रोज येतात-जातात, महिनादोन महिने किंवा विद्यार्थी वगैरे असतील तर वर्ष दोन वर्षे राहतात. या सर्वांना रोज पाणी द्यावे लागते. महापालिकेच्या मंजूर कोट्यातीलच पाणी ते वापरत असतात. ही तंरगती लोकसंख्या मोजलीच जात नाही.

जनगणना कार्यालयाकडे ही लोकसंख्या मोजण्याचा कसलाच फॉर्म्युला नाही. हे कार्यालय महापालिकेचेच आहे. ते मुख्य जनगणना कार्यालयाशी संलग्न आहे. त्यांच्याकडून या लोकसंख्येची कसलीच नोंद होत नाही. महापालिकाही त्यांच्या स्तरावर अशी काही नोंद करत नाही. गेल्या काही वर्षांत पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येऊन राहणाऱ्यांचीच संख्या लाखापेक्षा जास्त आहे. या विद्यार्थ्यांची कसलीही नोंद होत नाही. नोकरीतील बदली, व्यवसाय, काम यामुळे राहणारेही असेच काही लाखांच्या आसपास आहेत. महापालिका ही एकूण संख्या ५ लाख आहे, असे सांगत असली तरीही त्याला कसलाच आधार नाही. त्यामुळे ही लोकसंख्या दाखवून वाढीव पाणी मागणे अडचणीचे होणार आहे.कोणतीही पद्धत वापरात नाही1 सरकारी स्तरावर सन २०११ ची जनगणना वापरली जात असते. त्यानुसार पुणे शहराची लोकसंख्या ३५ लाख आहे. वाढीव लोकसंख्या मोजण्याची जनगणना कार्यालयाची एक पद्धत आहे. त्यानुसार आधीची १० वर्षांपूर्वीची जनगणना आकडेवारी व सुरू असलेल्या वर्षातील आकडेवारी यातील फरक लक्षात घेऊन टक्केवारी काढली जाते.2 ती जेवढी येईल ती १० वर्षांत विभागली जाते. वर्षाला किती लोकसंख्या वाढली, त्याचे उत्तर त्यात मिळते. ही पद्धत सर्वमान्य आहे. त्यानुसार पुढील १० वर्षांत प्रत्येक वर्षी लोकसंख्येत तेवढी वाढ गृहित धरली जाते.3 पुणे शहराच्या सन २००१ व सन २०११ या दोन जनगणनामधील फरक ३० टक्के आहे. त्याप्रमाणे दरवर्षी म्हणजे सन २०१२ मध्ये ३ टक्के, सन २०१३ मध्ये ३ टक्के अशी वाढ गृहित धरण्यात आली आहे. तरंगती लोकसंख्या मोजण्यासाठी मात्र कोणतीही पद्धत वापरात नाही. 

टॅग्स :Puneपुणे