शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

रब्बी आवर्तनावर भरारी पथकाची ‘नजर’

By admin | Published: November 20, 2015 2:45 AM

नीरा डावा कालव्यातून १४ नोव्हेंबरपासून रब्बी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, अल्प पर्जन्यमानामुळे वीर, भाटघर धरणातील पाणीपातळी कमालीची घटली आहे.

बारामती : नीरा डावा कालव्यातून १४ नोव्हेंबरपासून रब्बी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, अल्प पर्जन्यमानामुळे वीर, भाटघर धरणातील पाणीपातळी कमालीची घटली आहे. यामुळे या आवर्तनाावर पाटबंधारे विभागाने कडक नियंत्रण ठेवण्याचे ठरविले असून भरारी पथकाची ‘नजर’ ठेवण्यात येणार आहे. जुलैै २०१६ अखेर पिण्यासाठी व मंजूर औद्योगिक वापरासाठी पाणी राखून नियोजन करण्यात आले आहे. पाणीचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर सुरुवातीपासून नजर ठेवण्यात येणार आहे. चोरून पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीला समज देण्यात आली आहे. कालवा निरीक्षक, पाटकरी यांच्यामार्फत समज देण्यात आली आहे. गरज भासल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब भोसले, शाखाधिकारी शंकरराव चौलंग आदींचा भरारी पथकामध्ये समावेश आहे. कालव्यात पाणी सोडण्यापूर्वी भरारी पथकाने पाहणी करून सायफन काढले आहेत. पिण्याचे पाणी महिन्यातून तीन दिवस पोलीस बंदोबस्तात सोडण्यात येणार आहे. नीरा-डावा कालव्यावर बारामती शहरासह १० मोठ्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याचे पाटबंधारे खात्याचे उपविभागीय अधिकारी भोसले, शाखा अधिकारी चौलंग यांनी सांगितले.या आवर्तनानंतर १ एप्रिल २०१६ ला उन्हाळी आवर्तन देण्यात येणार आहे. मात्र, या आवर्तनाचा कालावधी उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून आहेत. (वार्ताहर)इंदापूरच्या २२ गावांंना लवकर पाणी द्या!वितरिका क्रमांक ४९, ५७, ५४ मोठ्या आहेत. त्यामुळे येथील क्षेत्र भिजण्यासदेखील वेळ जातो. परिणामी, या परिसरातून इंदापूर तालुक्यातील २२ गावांना नेहमी उशिरा पाणी मिळते. तोपर्यंत पिके जळून जातात. धरणात पाणीपातळी भरपूर आहे. ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा धरणात आहे. त्यामुळे २२ गावांतील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी द्यावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीचे नेते सूर्यकांत रणवरे यांनी केली आहे.