शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

Foxconn Vedanta Deal: वेदांता-फॉक्सकॉनवरून राजकारण जोरात जनता संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 09:15 IST

प्रकल्पाच्या स्थलांतरावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना जनतेमध्ये मात्र यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे...

पिंपरी : तळेगावमध्ये नियोजित असलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचे गुजरातला स्थलांतर झाले. त्यामुळे राज्यातील तब्बल दीड लाख तरुणांचा रोजगार बुडाला आहे. यावरून आता सत्ताधारी विरोधक आमने-सामने आले आहेत. प्रकल्प नेमका कोणामुळे राज्याबाहेर गेला हे सांगण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मैदानात उतरले आहेत. प्रकल्पाच्या स्थलांतरावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना जनतेमध्ये मात्र यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

तळेगावमध्ये सेमीकंडक्टर बनवण्याचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. त्यानंतर याला शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार असल्याचे सांगत विरोधक असलेल्या महाविकास आघाडीने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. यावरून ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठीच शनिवारी (दि. २४) आदित्य ठाकरे यांनी वडगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील जनतेला गाजर नको तर रोजगार हवा आहे. त्यामुळे या खोके सरकारविरोधात राज्यामध्ये जनआक्रोश मोर्चा आणखी तीव्र करणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले.

शनिवारी झालेल्या या जनआक्रोश मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपदेखील मैदानात उतरली आहे. भाजपच्या वतीने सोमवारी (दि. २६) वडगाव नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन झाले. यामध्ये खासदार श्रीरंग बारणे, आमदार राम कदम यांनी सहभागी होत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे राज्यातील जनतेशी खोटे बोलत असून प्रकल्प त्यांच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच बाहेर गेला असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच प्रकल्प राज्यात येण्यासाठी कंपनी प्रयत्न करत असताना ‘मविआ’मधील नेते त्यांच्याकडे पैसे मागत असल्याचा आरोपही केला. आगामी काळात प्रकल्प नेमका कोणामुळे बाहेर गेला हे सांगण्यासाठी राज्यातील गावा-गावामध्ये जाणार असल्याचे आमदार राम कदम यांनी सांगितले. त्यामुळे राज्यामध्ये भविष्यात एका बाजूला आदित्य ठाकरे यांचे जनआक्रोश आंदोलन असणार आहे. तर दुसरीकडे भाजपाचे ठिय्या आंदोलन असणार आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कोणामुळे गेला हे सांगण्यासाठी सत्ताधारी विरोधक दोघांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांवर जहरी टीका केली जात आहे. मात्र, सत्ताधारी विरोधकांच्या या आंदोलनामुळे जनता संभ्रमात सापडली आहे.

भाजपाचे दावे

आदित्य ठाकरे यांनी मावळात येत जनतेची दिशाभूल केली. तळेगाव निगडे टप्पा क्रमांक ४ मध्ये एमआयडीसीसाठी ६ हजार ६०० एकर जमीन होती. त्यामधील गावासाठी व शेतीसाठी जमीन सोडून ५ हजार ४०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार होते. २०१८ सालामध्ये शासनाच्या वतीने ७३ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या संमतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. मात्र, ही प्रक्रिया लांबवण्यात आली. तसेच भूसंपादन करण्यात येणाऱ्या काही भागामध्ये इको सेन्सिटिव्ह भाग होता. त्यासाठी तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी परवानगीसाठी तो केंद्र सरकारकडे पाठवणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने कंपनीने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा भाजप करत आहे.

महाविकास आघाडीचे दावे

महाराष्ट्रात येणारा प्रकल्प दुसरीकडे हलवणे अयोग्य आहे. महाराष्ट्रात येणारे प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये जात असल्याने कुंचबणा होत आहे. वेदांता व बल्क ड्रग पार्कसारखे महत्त्वाचे दोन प्रकल्प सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे राज्याबाहेर जात आहेत. वेदांता प्रकल्प तळेगावमध्ये येणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सभागृहामध्ये जाहीर केले होते. त्यानंतर एक महिन्यामध्ये असे काय झाले की दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणारा वेदांता प्रकल्प बाहेर गेला, असा सवाल महाविकास आघाडी करत आहे.

टॅग्स :PuneपुणेFoxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेRam Kadamराम कदम