शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
4
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
5
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
6
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
7
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
8
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
9
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
10
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
11
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
12
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
13
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
14
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
15
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
16
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
17
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
18
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
19
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी

By admin | Published: January 28, 2017 12:05 AM

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी वटहुकूम काढण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा,

मंचर : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी वटहुकूम काढण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रांदरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पुणे जिल्ह्यातही दिवाळीनंतर मे महिन्यापर्यंतच्या काळात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. गावोगावी होणाऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यती पाहताना अथवा त्यात सहभाग घेताना शेतकरी आपली सारी दु:खे विसरून आनंद घेत असतो. काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने बैल या प्राण्याचा अधिसूचित प्राण्यांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींवर बंदी लादली गेली आहे. या बंदीविरोधात शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली असून, सर्वोच्च न्यायालयातही शेतकऱ्यांच्या वतीने बैलगाडा मालकांच्या संघटना व मी स्वत: लढा देत आहे.बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी केवळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असून, त्यासाठी केंद्र सरकारने वटहुकूम काढून बैल हा प्राणी पर्यावरण विभागाच्या अधिसूचित यादीतून वगळण्याची गरज आहे. आपण तमिळनाडूच्या धर्तीवर आचारसहिंता संपल्यानंतर वटहुकूम काढण्याचे जाहीर केले असले, तरी त्या वटहुकमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, हे आज तमिळनाडूच्या वटहुकमाला देण्यात आलेल्या न्यायालयातील आव्हान याचिकेमुळे स्पष्ट झाले आहे.