शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

प्रस्ताव देऊनही टँकर मिळेना

By admin | Published: June 04, 2016 12:30 AM

पाणीटंचाईच्या परिस्थितीतही प्रशासकीय अनास्थेचा फटका तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना बसत आहे. महिन्यापूर्वी पाठविलेल्या टँकरच्या ८ प्रस्तावांपैकी केवळ चारच गावांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले

शिरूर : पाणीटंचाईच्या परिस्थितीतही प्रशासकीय अनास्थेचा फटका तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना बसत आहे. महिन्यापूर्वी पाठविलेल्या टँकरच्या ८ प्रस्तावांपैकी केवळ चारच गावांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, टँकर मंजूर होऊन चार दिवस उलटूनही टँकर सुरू करण्यात आले नसल्याचे चित्र आहे.तालुक्यातील पिंपळसुटी, शिरसगावकाटा, तर्डोबावाडी, मिडगुलवाडी, मलठण, न्हावरे-करडे व चव्हाणवाडी या गावांचे प्रस्ताव पंचायत समितीने एप्रिलच्या (२०१६) दुसऱ्या आठवड्यात तहसीलकडे पाठविले. तहसील कार्यालयाने मंजुरीसाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले. यांपैकी पिंपळसुटी, शिरसगावकाटा, तर्डोबावाडी व मिडगुलवाडी या गावांचेच टँकर मंजूर करण्यात आले. दीड महिन्याने या गावांचे टँकर मंजूर झाले. ३१ मे रोजी टँकर मंजूर झाले; मात्र एजन्सीकडे टँकरच उपलब्ध नसल्याने या मंजूर गावांना अद्याप टँकर पाठविण्यात आलेले नाहीत. मलठण, न्हावरे, करडे व चव्हाणवाडी या गावांचे टँकर मंजूर न झाल्याने तेथे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.नव्याने कोंढापूर, तळेगाव ढमढेरे व केंदूर येथील टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. अद्याप हे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे आले नसल्याचे तहसीलच्या सूत्रांनी सांगितले. टंचाईच्या कालावधीतही प्रशासन वेगाने टँकर मंजुरीसाठी कार्यवाही करताना दिसत नाही. प्रस्ताव द्यायचा पंचायत समितीकडे व पंचायत समिती तो पाठविणार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या, प्रक्रियेतच बराच कालावधी जातो. तहसीलच्या स्तरावरच टँकर मंजुरीचे अधिकार असावेत, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. ज्या गांवाचे प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत, त्यांनी प्रस्ताव दाखल करून दीड महिना उलटून गेला. आता काय पावसाळ्यात यांचे प्रस्ताव मंजूर होणार का, असा प्रश्न आहे.