शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

घोड नदीचे पात्र कोरडे, दिवसाआड पाणीपुरवठा सुरू; बंधाऱ्यांचे ढापे काढल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 15:02 IST

मंचर ( पुणे ) : घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढण्यात आल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यात पावसाने ...

मंचर (पुणे) : घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढण्यात आल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची टंचाई नदीकाठच्या गावांना जाणवत असून, काही गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतोय.

घोड नदीवर आंबेगाव शिरूर तालुक्यात सुमारे २५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. पावसाळा संपला की बंधाऱ्याचे ढापे टाकून बंधारे पाण्याने भरून घेतले जातात. त्यानंतर या पाण्याचा उपयोग शेतीसाठी तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी होत असतो. वर्षभर बहुतेक बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले असतात. पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस संबंधित बंधाऱ्याचे ढापे पाटबंधारे विभागाकडून काढले जातात. यावर्षी त्याप्रमाणे हे ढापे काढण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्र कोरडे पडले आहे. थोड्याशा जागेत पाणीसाठा शिल्लक असला तरी बहुतेक घोड नदी कोरडी झाली आहे. यावर्षी आतापर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी वळवाचा तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत असला तरी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. परिणामी नदीतून अद्याप पाणी वाहिलेले नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीपंप बंधाऱ्यात टाकून त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जात होता. आता बंधाऱ्यातील पाण्यानेच तळ गाठल्याने वीजपंप बंद आहेत.

शेतातील पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. नदीकाठी असलेल्या विहिरीतून अनेक गावांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो. आता या विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. अनेक गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतोय. सध्या पावसाचे वातावरण झाले असून, सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नजीकच्या काळात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अजून भीषण होणार आहे.

श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग गावाला घोड नदीकाठी असलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा होतो. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत सदर विहीर असल्याने वर्षभर पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र बंधाऱ्याचे ढापे काढण्यात आल्याने आता विहिरीने तळ गाठला आहे. वीजपंप दिवसाआड कसाबसा तीन तास चालू राहतो. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करता येत नाही. शिवाय विजेचा लपंडाव सुरू असतो. घोड नदीला पाणी आल्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.

-वैभव पोखरकर, सरपंच, श्री क्षेत्र वडगाव, काशिंबेग

टॅग्स :riverनदीPuneपुणेMancharमंचर