शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

जिरायती पट्ट्यात चौैथ्या वर्षी खरीप जाणार वाया

By admin | Published: July 07, 2015 2:44 AM

बारामती तालुक्यातील जिरायती भागातील खरीपाच्या आशा धूसर झाल्या आहेत. विशेषत : जिरायती भागाचा मुख्य आधार असलेला खरीप हंगाम सलग चौथ्या वर्षी वाया जात आहे.

लोणी भापकर : बारामती तालुक्यातील जिरायती भागातील खरीपाच्या आशा धूसर झाल्या आहेत. विशेषत : जिरायती भागाचा मुख्य आधार असलेला खरीप हंगाम सलग चौथ्या वर्षी वाया जात आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, दुध उत्पादकांपुढे मोठेच संकट ठाकल्याचे चित्र आहे. तर ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतिक्षा करावी लागत आहे. े.यामुळे या भागातील नवीन पिढी शहराकडे स्थलांतरित होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. मोरगाव, सुपे या जिरायती पट्ट्यात खरीप हंगामातील बाजरी ,मूग ,मटकी, हुलगा, सूर्यफूल, हळवी कांदा ही पीके घेतली जातात. पुरेशा पाऊस असेल तर ही पीके केवळ पावसावरही पदरात पडतात. यासाठी मे महीन्यातील मान्सूनपूर्व रोहीणी नक्षत्रातील अवकाळी पावसाची गरज असते. त्यानंतर जून महीन्यातील मृग नक्षत्रातील ओलीवर पेरण्या मार्गी लागतात. मात्र यंदा सलग चौथ्या वर्षी मे जून मधील पावसाने हुलकावणी दिली. कमी दाबाच्या प्रभावामुळे झालेल्या थोडयाशा पावसाच्या ओलीवर या भागात बाजरी, मूग, कांदा या पीकांच्या पेरण्या उरकल्या आहेत. मात्र नंतर पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने उगवलेली पीके सुकून जात आहे.यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दिवसभर कडक ऊन व वाहणारे कोरडे वारे यामुळे सध्यातरी पावसाची शक्यता नसल्याने उगवलेली पिके आणखी किती दिवस तग धरणार अशा विवंचनेत शेतकरी वर्ग आकाशाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र जिरायती भागात दिसत आहे. या भागातील मजूरवर्ग बागायती भागाकडे स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहे. ऐन पावसाळ्यात परीसरातील ओढे, नाले, पाझर तलाव कोरडेच आहेत. (वार्ताहर)