शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

लेक लाडकी त्या घरची....काढली वरात '' बुलेट '' वरची... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 17:32 IST

शेतकऱ्याने आपल्या मुलीची घरापासून थेट विवाहस्थळापर्यंत बुलेटवरून वरात काढुन तिची हौस पूर्ण केली आहे...

बारामती : लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता..तशी वधूकडची मंडळीत चुळबुळ सुरु झाली.. विशेष करुन मुलीच्या मैत्रिणी , नातेवाईक महिला यांचा काहीतरी प्लॅन सुरु असल्याची कुजबुज वऱ्हाडी मंडळींच्या कानावर पडली. पण नेमकं वधूपक्षात चाललंय तरी काय..थांगपत्ता काही केल्या लागेना.. इतक्यात मुहूर्त जवळ आल्यावर एकदम बुलेट गाड्यांचा आवाज येऊ लागला.. इंदापुर तालुक्यातील सणसर येथील शेतकऱ्याच्या मुलीची बुलेटवरुन लग्नमंडपात अवतरली.. आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अशा प्रकारे बुलेटवरुन काढलेली वरात परिसरात कुतुहलाचा विषय ठरली.. मुलीला दुचाकी चालविण्याची आवड आहे. विशेष तिला बुलेट चालविण्याचे मोठे आकर्षण आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने आपल्या मुलीची घरापासून थेट विवाहस्थळापर्यंत बुलेटवरून वरात काढुन तिची हौस पूर्ण केली आहे. सणसर परिसरातील या वधुची संपुर्ण वरातच बुलेटवर काढण्यात आली.या वरातीमध्ये वधुसह २५ बुलेटस्वार सहभागी झाले होते. नातेवाईकांसह सणसरच्या ग्रामदैवताला फेरी मारुन वरात विवाहस्थळी पोहचली. प्रकाश विनायकराव निंबाळकर यांची ज्येष्ठ कन्या रेश्मा हिचा विवाह श्री क्षेत्र माहुली (तालुका आणि जि.सातारा )येथील नारायण आबाजी जाधव यांचे ज्येष्ठ चिरंजीव गौरव याच्यासमवेत भवानीनगर येथे श्री छत्रपती मंगल कार्यालयात पार पडला. मुलगी रेश्मा आर्किटेक्चर इंजिनिअर आहे. या विवाहासाठी सकाळपासूनच मित्र परिवार आणि नातेवाईक जमा झाले.  बॅन्ड-बाजा,ताशा,तुतारी सारख्या पारंपारीक वाद्याद्वारे यावेळी नातेवाईक मंडळींचे स्वागत सुरु  होते. यावेळी एकाच वेळी २५ बुलेटच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यावर नववधू  रेशमा चक्क फेटा बांधून, गॉगल लाऊन लग्न मंडपात दाखल झाली. यावेळी वधुसमवेत असणाºया इतर नातेवाईकांनी देखील पारंपारीक फेटे परीधान केले होते. त्यामुळे हि आगळीवेगळी वरात पाहुन अनेकांच्या  भुवया उंचावल्या. वधु म्हणजे लाजत, खाली मान घालुन मंडपात प्रवेश करते,हा बहुतांश  विवाहामधील अनुभव आहे.आज मात्र, नवरीबाईचा बुलेटवरील  थाट,आत्मविश्वास पाहुन अनेकांनी टाळ्या वाजवुन तिचे स्वागत केले.  मुलीचे चुलते जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की, मुलगी म्हणजे दोन्ही घरांना जोडणारा दुवा असतो.तिच्या भावनांचा सन्मान राखणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आजच्या युगात मुलींच्या आवडीनिवडी महत्वपुर्ण आहेत.माझ्या पुतणीला सर्वच दुचाकी चालविण्याचे कसब आहे.बुलेटची तिला विशेष आवड आहे.त्यामुळे तिच्या विवाहानिमित्त पाठवणीची ही वरात आगळीवेगळी काढ्ण्याची संकल्पना आम्ही कुटुंबियांनी राबविली. 

टॅग्स :Indapurइंदापूरmarriageलग्नWomenमहिला