शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ’भारतरत्न’ द्या : क्रांतीज्योत आंदोलकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 11:18 IST

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ गावापासून 28 जुलै रोजी या क्रांतीज्योत आंदोलनाचा प्रारंभ झाला.

ठळक मुद्देअण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे:- बहुजन समाजाच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडणारे, शोषित आणि पीडितांमध्ये आपल्या हक्कांसाठी बंडाची मशाल पेटवणारे आणि साहित्याद्वारे वैश्विक झेप घेऊन मानवतावादाचा ध्वज उंचावणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवांकीत करावे, अशी मागणी अण्णाभाऊ साठे यांच्या शेकडो विचार समर्थकांनी बुधवारी क्रांतीज्योत आंदोलनाद्वारे केली.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने झोपडपट्टी सुरक्षा दल, दलीत विकास आघाडी आणि कामगार सुरक्षा दलातर्फे या क्रांतीज्योत आंदोलनाचे आयोजन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली  करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ गावापासून 28 जुलै रोजी या क्रांतीज्योत आंदोलनाचा प्रारंभ झाला. तेथून कराड-सातारा-खंडाळा-शिरवळ आणि पुणे यामार्गे क्रांतीज्योतीचे  सारसबाग येथील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आगमन झाले. त्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग असलेली क्रांतीज्योत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य महामोर्चा द्वारे नेण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि अण्णा भाऊंच्या जयघोषाने दुमदुमलेल्या आंदोलनाद्वारे कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. यानंतर ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने अण्णाभाऊ साठेंना गौरवांकीत करण्याच्या मागणीचे निवेदन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणे