शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शनिवार वाडा राजकीय सभांसाठी भाड्याने द्या : महापौरांकडे काँग्रेसची लेखी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 11:45 IST

शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दी निमित्त एल्गार परिषदेत गुजरातचे आमदार वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगाव भीमाची दंगल घडल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे.

ठळक मुद्देलोकमान्य टिळकांपासून ते काकासाहेब गाडगीळ, यशवंतराव चव्हाण अशा अनेक नेत्यांच्या सभा एखाद्या कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कोणत्याही कार्यक्रमांसाठी पोलिस परवानगी व एनओसी घेणे बंधनकारककार्यक्रमामुळे मोठी वाहतूक कोंडी

पुणे: पुण्यातील शनिवार वाडा पटांगणात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सभा होत आल्या आहेत. लोकमान्य टिळकांपासून ते काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, शंकरराव मोरे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार व सध्याचे मुख्यमंत्री अशा अनेक नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. परंतु, आता शनिवार वाड्यावर कोणत्याही राजकीय कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीचे सचिव संजय बालगुडे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवार वाडा राजकीय सभासाठी भाड्याने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. पुणे शहराचे वैभव व ऐतिहासिक वारसा म्हणून शनिवारवाड्याकडे पाहिले जाते. पुण्यात पर्यटनासाठी येणारे देश-विदेशातील नागरिक आवर्जुन शनिवारवाड्याला भेट देतात. शनिवार वाड्यामुळे पुण्याच्या पर्यटनाला देखील वेगळी ओळख मिळाली आहे. याच शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दी निमित्त एल्गार परिषद आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी  आणि जेएनयू छात्र संघटनेचा उमर खलिद यांच्या वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगावभीमाची दंगल घडल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे शनिवार वाड्यावर सर्व खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शनिवार वाड्या लगतच संवेदनशील परिसर असून, शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या भागात एखाद्या कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच कार्यक्रमामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी देखील होत असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने महापालिकेला कळविण्यात आले आहे. तसेच राज्याच्या विविध भागातून शनिवार वाडा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहली देखील येतात. कार्यक्रमांमुळे बाहेरून येणा-या पर्यटकांना त्याचा आनंद घेता येत नाही. यामुळेच महापालिकेच्या वतीने यापुढे शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबात बालगुडे यांनी सांगितले की, शनिवार वाडा राजकीय सभांसाठी उपलब्ध करुन देऊ नये असे आदेश महापालिकेने काढले आहेत. तसेच अन्य कोणत्याही कार्यक्रमांसाठी पोलिस परवानगी व एनओसी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेने जागा भाड्याने दिल्यावर पोलिसाची परवानगी घेणे गरजेचे नाही. तसेच शनिवार वाड्यावर सभा ही पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग आहे. त्यामुळे आपण त्वरीत आदेश देऊन शनिवार वाडा राजकीय सभा, कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी लेखी मागणी बालगुडे यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :PuneपुणेShaniwar WadaशनिवारवाडाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण