शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

राज्यसभेची आम्हाला किमान एक तरी जागा द्याच; पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

By राजू इनामदार | Published: January 31, 2024 4:18 PM

राज्यसभेच्या राज्यातील ६ रिक्त जागांपैकी तब्बल ५ जागा भाजपला मिळणार आहेत....

पुणे : पक्षाला महापालिकेत कधी मिळाली नव्हती ती एकहाती सत्ता मिळाली, एकाचवेळी सर्व विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून दिला, त्यामुळे राज्यसभेच्या ६ रिक्त जागांपैकी किमान एक जागा तरी पुणे शहराला द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येत आहे.

राज्यसभेच्या राज्यातील ६ रिक्त जागांपैकी तब्बल ५ जागा भाजपला मिळणार आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदार असतात. फक्त भाजपच्याच आमदारांची संख्या १०४ आहे. त्याशिवाय महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांचेही आमदार भाजपकडेच आहे. या दोन गटांना प्रत्येकी एक जागा दिली तरीही भाजपकडे ३ जागा राहतात. त्यातील एक जागा पुण्याला द्यावी अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. सध्या पुण्याचे दिल्लीतील लोकनियुक्त प्रतिनिधित्व खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त आहे. त्यातच राज्यसभेतही कोणी नसल्यास पुण्याचे दिल्लीत कोणीच नाही अशी स्थिती होईल.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुण्याचे आहेत. ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांची जागा रिक्त होत आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच एका जागेवर आमचा राजकीय हक्कच आहे असे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे शहराने मागील काही वर्षात प्रत्येक निवडणूकीत भाजपला साथ दिली आहे. एकाचवेळी खासदार, आमदार व महापालिकेतील नगरसेवक अशी सत्ता भाजपकडे होती. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. पुणेकरांनी इतके भरभरून मतदान केले असताना त्यांना डावलणे राजकीय दृष्ट्या योग्य होणार नाही असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. राज्यसभेत पुण्याचा किमान एक सदस्य असणे योग्य आहे. पक्षासाठीही ते चांगले होईल. त्यामुळे उमेदवार कोण ते पक्षाने ठरवावे, मात्र ६ रिक्त जागांपैकी किमान १ जागा पुणे शहराला द्यावी असे मत भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. मात्र लोकसभेची उमेदवारी पुण्यातून मिळावी यासाठीही ते प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. राज्यसभेची जागा पुण्याला द्यायची की नाही याचा निर्णय केंद्रीय स्तरातूनच होणार असल्याने तिथेच जोर लावण्यात येत असल्याची चर्चा आहे.

राज्यसभेत प्रतिनिधित्व असणे ही त्यात्या शहरासाठी गौरवाची गोष्ट असते. पुण्याला हा मान मिळावा या पदाधिकाऱ्यांच्या मतामध्ये काहीच गैर नाही. या जागांचा निर्णय पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेत असते. उमेदवार ठरवण्याचा अधिकारही त्यांचाच असतो. त्यांच्यापर्यंत आम्ही ही मागणी पोहचवू. मागणी योग्य आहे असेच माझेही मत आहे.

- धीरज घाटे- शहराध्यक्ष, भाजप, पुणे

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा