शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

Republican Party Of India: आम्हाला जागा द्या, अन्यथा तुमचा प्रचार करणार नाही, RPI चा भाजपला कडक शब्दात इशारा

By राजू इनामदार | Updated: October 14, 2024 15:13 IST

आम्ही विधानसभेसाठी १२ जागा मागत आहोत, पण त्याबाबत महायुती एकही शब्द बोलत नाही, आंबेडकरी जनता महायुतीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

पुणे: आमचे नेते विधानसभेच्या १२ जागा मागत आहेत, त्यावर तूम्ही एक शब्दही बोलायला तयार नाही, आंबेडकरी जनतेची मते तूम्हाला हवीत, पण तळातील कार्यकर्ते वंचितच ठेवायचे आहेत, त्यामुळे आता जागा नाहीत तर मग तूमचा प्रचारही नाही अशा कडक शब्दांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या वतीने महायुतीला इशारा देण्यात आला.

भारतीय जनता पक्षाने आरपीआय बरोबर युती तर केली आहे, मात्र सत्तेतील वाटा देण्याबाबत आंबेडकरी जनतेला कायम झुलवतच ठेवले आहे, असा थेट आरोप यावेळी करण्यात आला. महायुतीतील अन्य दोन पक्षही असेच असल्याची टीका करण्यात आली. मते हवीत तर मग विधानसभेच्या किती जागा देणार ते सांगा, अन्यथा यावेळी आंबेडकरी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी गर्भित धमकीच कार्यकर्त्यांनी दिली.

पक्षाचे राज्य सचिव परशूराम वाडेकर यांनी सांगितले की, पक्षाच्या पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ही बैठक उत्स्फूर्त आहे. भाजप आणि महायुतीच्या फसवेगिरीला कार्यकर्ते आता कंटाळले आहेत. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले मागील कितीतरी दिवसांपासून पक्षासाठी विधानसभेच्या १२ जागा मागत आहेत. मात्र आमची ज्यांच्याबरोबर युती आहे तो भाजप किंवा युतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) वराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)यावर एक चकार शब्द बोलत नाहीत. जागा वाटपाच्या चर्चैतही आठवले यांना कधीच बरोबर घेतले झात नाहीत. याचा सरळ अर्थ ते आम्हाला ग्रुहित धरून आहेत असाच होतो.

आंबेडकर विचारांना विरोध असलेल्या पक्षाबरोबर युती करण्याचे राजकीय धाडस आठवले यांनी दाखवले, ते आंबेडकरी जनतेला सामाजिक आर्थिक राजकीय फायदा मिळावा म्हणून, प्रत्यक्षात मात्र भाजपला, महायुतीला राजकीय फायदा व आंबेडकरी जनता मात्र उपेक्षित अशी स्थिती आहे. लोकसभेलाही एकही जागा दिली नाही. आता विधानसभेलाही तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे. आरपीआय कार्यकर्ता हे सहन करणार नाही असे वाडेकर म्हणाले. पुण्यातील कँन्टोन्मेट तसेच राज्यातील अन्य ११ विधानसभा मतदार संघ आरपीआय साठी सोडावेत, अन्यथा या विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या प्रचारासाठी एकही कार्यकर्ता बाहेर पडणार नाही असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांना पाठवले असल्याची माहिती वाडेकर यांनी दिली.

पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी १२ जागांची भूमिका जाहीर केली आहे. आम्हाला ते मान्य आहे. तीच मागणी आम्ही करत आहोत. आठवले यांची लवकरच भेट घेऊन त्यांना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार आहे.- परशूराम वाडेकर, महासचिव. आरपीआय, (आठवले गट)

टॅग्स :Puneपुणेvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार