शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

सरकारला सामान्यांचा विसर

By admin | Published: October 15, 2015 1:03 AM

देशात मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. सामान्य माणसालाही जगण्याचा हक्क आहे, याचा सरकारला विसर पडलेला दिसतो

पुणे : देशात मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. सामान्य माणसालाही जगण्याचा हक्क आहे, याचा सरकारला विसर पडलेला दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण १२५ कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे सांगतात. त्यात मुस्लिमांचा समावेश नाही का, असा सवाल मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांनी केला. सय्यदभाई यांनी सामाजिक ध्रुवीकरणाचा निषेध करून ‘दगडावरची पेरणी’ या साहित्यकृतीसाठी मिळालेला न. चिं. केळकर पुरस्कार मानधनाच्या रकमेसह परत पाठविला आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘भारतीय मुस्लिमांनाही जगण्याचा समान अधिकार आहे. या समाजाची सगळीकडून कुचंबणा होत आहे. सध्या देश जातीय दंगलींनी पोखरून निघाला आहे. मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून गेली ५० वर्षे मी विवेकवादाचे, सुधारणांचे कार्य करीत आहे. मात्र, या कार्यालाच आव्हान देणाऱ्या घटनांमुळे व्यथित होऊन मी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.’’समाजात धर्मांधता वाढत चालली आहे. या विदारक परिस्थितीबाबत सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने पुरस्कार परत करणार असल्याचे लोकशाहीर संभाजी भगत यांनी सांगितले. त्यांना ‘नागरिक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.