शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे राजकारण्यांच्या हातून; पुण्यातून काँग्रेसची टीका

By राजू इनामदार | Updated: May 17, 2023 16:31 IST

राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार बंद करावा व सर्व पदे योग्य त्या यंत्रणांमार्फत रितसर पद्धतीने भरावीत असे काँग्रेसचे म्हणणे

पुणे: सरकारी नोकरी सरळ सेवा भरतीने करण्याचे टाळून तात्पुरत्या स्वरूपात नोकरी द्यायची, व त्याचीही नियुक्ती पत्रे सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांकडून द्यायची या प्रकारावर काँग्रेसने टीका केली आहे. राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार बंद करावा व सर्व पदे योग्य त्या यंत्रणांमार्फत रितसर पद्धतीने भरावीत असे काँग्रेसने म्हटले आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून मंत्री अथवा अन्य लोकप्रतिनिधींच्या हस्ते अशा प्रकारच्या तात्पुरत्या सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे मेळावे आयोजित करून दिली जात आहेत. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, अशा प्रकारे सरकारी नोकरी देण्याचा प्रकार आधीच्या कोणत्याही सरकारमध्ये झालेला नाही. सर्व पदे ही सरळ सेवा भरतीने रितसर परिक्षा, मुलाखत दिल्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर व तीसुद्धा लोकसेवा किंवा राज्य सेवा आयोगाच्या माध्यमातून जमा केली जात असत.

सध्या सरकारी नोकर भरती जवळपास बंदच करण्यात आली आहे. त्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या दिल्या जातात. या नियुक्त्या करण्याआधी निवड कोणत्या पद्धतीने केली जाते, त्यात पारदर्शकता नाही. शिवाय ज्यांची नियुक्ती केली जाते, त्यांना नियुक्ती पत्रे राजकीय नेत्यांच्या हस्ते, मेळावा वगैरे आयोजित करून दिली जातात. हा सर्वच प्रकार निषेधार्ह असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.

यातून संबधित सरकारी नोकरदाराला उपकृत केल्याची भावना निर्माण होते. सरकारी नोकरदापाकडून जनसामान्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिनेे ही गोष्ट गैर आहे. त्यामुळे सरकारनेच ही नवी, अन्यायकारक पद्धत त्वरीत थांबवावी, अन्यथा न्यायालयाने स्वत: याची दखल घ्यावी व सरकारला समज द्यावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणSocialसामाजिकjobनोकरी