शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

"सरकारला पाडायला ताकद लागते..! जयंत पाटलांनी ते करून दाखवावं" - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 1:46 PM

भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि निवडणूक यासाठी बांधील आहे

पुणे : एखादा विषय मार्गी लागेपर्यंत थांबलो नाही हा आमचा संघर्ष आहे. असा संघर्ष करून अजित पवार आमरण उपोषणाला बसले ते बघणं महाराष्ट्राला आवडेल. जयंत पाटील यांनी म्हणत रहावं सरकार पडेल म्हणून. सरकारला पाडायला ताकद लागते. जयंत पाटलांनी ते करून दाखवावं असे आव्हान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. 

पाटील म्हणाले,  भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि निवडणूक यासाठी बांधील आहे. गेले अडीच वर्षे आम्ही संघर्ष केला. सरकारला झोपू दिलं नाही. वर्षानुवर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचा संघर्ष डीएनएच नाहीये. सरकारला पाडायला ताकद लागते. जयंत पाटलांनी ते करून दाखवावं. 

अंधेरी निवडणुकीबाबत बोलताना पाटील म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणी कोणावर काय आरोप करायचे यावर बंधन आणता येत नाही. अंधेरीमध्ये लोकांची मानसिकता काय आहे कळत नाही. त्यामुळे लोकांचं मी सांगू शकत नाही. नोटाला का मतदान झालं कळत नाही. 

जसा निधी उपलब्ध होईल तशी त्यांच्याही कामांना यादीत स्थान दिले जाईल

नाना पटोले यांना लोक गांभीर्याने घेत नाहीये. पुण्यात नियोजन बैठकीमध्ये आमच्यावेळी विरोधी आमदारांना कमी निधी देऊन तोंडाला पाणी पुसले होते. त्यामुळे मी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे आणि सुनील शेळके यांचे निधी कमी केले. पण त्यांचेही अंदाजपत्रक सेव्ह करायला सांगितले आहे.  जसा निधी उपलब्ध होईल तशी त्यांच्याही कामांना यादीत स्थान दिले जाईल. कारण आमची सत्ता आली, निधी तर द्यावा लागेल. 'मातोश्री' किंवा 'वर्षा'मध्ये जाऊन कोणी सभा घेऊ शकत नाही. त्यामुळे अंगणात घ्यायला काय हरकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलJayant Patilजयंत पाटीलNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारण