शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

सरकार योजना जाहीर करते, मात्र त्या प्रत्यक्षात येण्यासाठी सिस्टीम असल्याने तिला वेळ लागतो - बैजयंत पांडा

By राजू इनामदार | Updated: March 3, 2025 18:26 IST

सरकारी योजनेचा मध्यमवर्गीय घटकांना लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे

पुणे: सरकार योजना जाहीर करते. त्याचा थेट जनतेला लाभ मिळण्यासाठी काही पद्धत असते. ती सुरू होऊन नियमित होण्यासाठी काही वेळ लागतो असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, दिल्लीचे खासदार बैजयंत पांडा यांनी केले. भारत आता जगातील ५ वी अर्थसत्ता झाल्याचा दावा त्यांनी केला.केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्द्यांची माहिती देण्यासाठी म्हणून पांडा पुण्यात आले होते. पक्ष कार्यालयात त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. 

पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी, शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच पुनीत जोशी, अमोल कविटकर, करण मिसाळ, रविंद्र साळगावकर व अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. पांडा म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाला नवे वळण मिळाले. आज जगात मोदी यांचे नाव आहे, सगळे राष्ट्रप्रमूख त्यांना मानतात. अर्थक्षेत्रात भारताने मोठी भरारी घेतली, याचे कारण अर्थसंकल्पात देशातील प्रत्येक समाजघटकाचा विचार करून योजना निश्चित केल्या आहेत. देशात वैद्यकीय शिक्षणांच्या १० हजार जागा वाढतील. शेती, उद्योग अशा अनेक क्षेत्रात नव्या योजना आणल्या आहेत. ५ प्रमुख मुद्दे निवडून त्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

सार्वजनिक आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टींकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष आहे, त्याचा त्रासदेशातील मध्यमवर्गीय घटकाला होत आहे, त्यावर काहीच ऊपाययोजना नाहीत याकडे लक्ष वेधले असता पांडा यांनी आकडेवारी देण्यास सुरूवात केली. ती थांबवून साध्या केजीला प्रवेश देताना लाख रूपये द्यावे लागतात असे सांगितले असता पांडा यांनी ही वस्तूस्थिती असल्याचे मान्य केले.

ते म्हणाले, "सरकार योजना जाहीर करते, मात्र त्या प्रत्यक्षात येण्यासाठी सिस्टीम असते. तिला वेळ लागतो. जीएसटी कर लागू केला त्यावेळी सरकारवर टीका झाली, मात्र आता ही करप्रणाली व्यवस्थित झाली आहे. आयुष्यमान योजना, कँशलेस या योजनांना वेळ लागतो आहे, मात्र त्या यशस्वी होतीलच. सरकारी योजना सक्षम होण्यास वेळ लागतो. खासगी व सरकारी यामध्ये ज्याला जे पसंत ते तो स्विकारतो. मध्यमवर्गीय घटकांना लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे पांडा म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेgovernment schemeसरकारी योजनाBJPभाजपाIndiaभारतSocialसामाजिकMONEYपैसा