शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

ग्रामसुधार सदिच्छा दूताला परीक्षेचा मुहूर्त; राष्ट्रीय सेवा योजना, २ महिन्यांचा कालावधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:45 IST

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या प्रसारासाठी राज्य सरकारने सदिच्छा दूताची नेमणूक केली असून, त्यासाठी चक्क परीक्षा हंगामाचा मुहूर्त काढला आहे.

ठळक मुद्देअमृता करवंदे यांनी ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून निवड केल्याबद्दल सरकारचे मानले आभार शासनाने माझा नाही तर या देशातील सर्व अनाथांचा आणि वंचिताचा गौरव केला : करवंदे

पुणे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या प्रसारासाठी राज्य सरकारने सदिच्छा दूताची नेमणूक केली असून, त्यासाठी चक्क परीक्षा हंगामाचा मुहूर्त काढला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा कालावधी २०१७-१८ या शैक्षणिक कालावधीपुरता आहे. हा कालावधी संपण्यास दोन ते तीन महिनेच उरले आहेत; त्यामुळे ही नियुक्ती कागदोपत्रीच ठरण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी २६ सप्टेंबर २०१७ला शाासन निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नवेली देशमुख आणि महाराष्ट्र लोकसेवा अयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अमृता करवंदे यांची निवड करण्यात येणार होती. त्यानुसार त्यांची ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केल्याचा शासन निर्णय मंगळवारी (दि. ६) प्रसिद्ध करण्यात आला. विनामानधन तत्त्वावर ही नियुक्ती असेल. याअंतर्गत विद्यार्थी व युवकांशी संवाद साधणे, राष्ट्रीय सेवा योजनेने घेतलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करणे अशी कामे या दूतांना करावी लागतील. तसा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्रम समन्वयक, तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक यांची असेल. त्यांच्या प्रवास आणि निवासाची व्यवस्था संबंधित विद्यापीठ करेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या दूतांचा कालावधी हा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी असेल. मार्च महिन्यात शैक्षणिक वर्ष संपुष्टात येईल, तसेच सध्या परीक्षांचा हंगामदेखील सुरू असल्याने या दूतांना कोणतेच काम करता येणार नाही.  

अनाथांचा गौरवसदिच्छादूत अमृता करवंदे यांनी ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून निवड केल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. ‘शासनाने माझा नाही तर या देशातील सर्व अनाथांचा आणि वंचिताचा गौरव केला आहे. मी अनाथांचे प्रश्न घेऊन सरकारदरबारी जाणारी एक सामान्य मुलगी आहे. आमच्या मागणीची दखल घेणे आणि माझी सदिच्छा दूत म्हणून निवड करणे हा आमचा सामूहिक सन्मान आहे. सरकारने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करीन,’ अशी प्रतिक्रिया करवंदे यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणे