शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

Ground Report | नवले ब्रीज अपघातातून बोध न घेतल्यास मोठ्या जीवितहानीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 3:51 PM

अपघातमागील कारणांची चिकित्सा आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे...

- पांडुरंग मरगजे

धनकवडी (पुणे) : ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ४८ वाहनांना अपघात, ही घटना 'काळ आला पण वेळ आली नव्हती', असे म्हणून कानाडोळा करण्याची नाही. कारण याच उतारावर विविध अपघातांमध्ये आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे दैवावरती हवाला न ठेवता या अपघातमागील कारणांची चिकित्सा करणे आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी रस्ते वाहतूक आणि पोलीस प्रशासनाकडून होणे, गरजेचे असल्याचे लोकमत पाहणी स्थळ अहवालामध्ये समोर आले आहे.

रविवारी नवले ब्रीज अपघाताचे जे प्रमुख कारण समोर आले आहे ते म्हणजे ट्रक चालकाचे ट्रकवरील सुटलेले नियंत्रण होय. सातारा रोड नवीन एक्स्प्रेस हायवेवर शिंदे वाडीकडून बोगद्यामार्गे पुण्याकडे येताना ३.५ ते ४ %  ग्रॅडियंट उतार आहे. शास्त्रीय दृष्ट्या ५ % ग्रॅडियंट उतार योग्य असला तरी माणसशास्त्रीयदृष्या या उताराचा विचार होणे गरजेचे आहे. बोगद्यातून ( ३ ते ५ किमी) प्रवास केल्यानंतर मोकळ्या रस्त्यावर आल्यानंतर थोडंसं हायसं वाटतं आणि आता शहर जवळ आल्याच्या भावनेतून वाहनांची गती वाढवण्याकडे कल होतो. 

'स्ट्रक्चरल ऑडिट' गरजेचे-

अशावेळी या मार्गावर गतिदर्शक फलक असावेत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून गती अधिक आढळल्यास तत्काळ कारवाई केली गेली पाहिजे. तसेच स्पीड ब्रेकर बसवणे, त्यांची संख्या वाढवणे, हे तात्पुरते उपाय योजने जसे गरजेचे आहे त्याच प्रमाणे या मार्गाचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' करून यातील दोष कायमस्वरूपी काढून टाकणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी पोलीस चेक पोस्ट असणे गरजे चे असून ड्रायव्हर वाहन बंद अर्थात न्युट्रलवर चालवत असल्यास त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

चालकांना सामारे जावे लागते 'या' अडचणींना-

लांबच्या पल्ल्याच्या ट्रक ड्रायव्हरसाठी ट्रक चावलणे हे प्राण पणाला लावून चालवण्याचे काम असते. लांबचा पल्ला, कनसाईनमेंट अर्थात मालाची खेप वेळेत पूर्ण करणे व त्यासाठी मालकाचा तगादा असणे, जेवणाच्या व झोपेच्या अनियमित वेळा, आरोग्याची हेळसांड, बदली माणूस नसणे, घरापासून मैलोनमैल दूर असणे, रात्रंदिवस करावे लागणारे ड्रायव्हिंग, पोलीस प्रशासनाचा अनंत कारणे दाखवून कारवाईचा बडगा आणि भावनाशून्य वर्तन अशा अनंत अडचणींना या ड्रायव्हर मंडळींना तोंड द्यावे लागते. 

ओव्हरटाईम कामाचा परिणाम-

नोकरदार आठ तास नोकरी करतो व घरी जातो. तर ड्रायव्हर मंडळी दिवसाचे १८ ते २४ तास ट्रकवर कार्यरत असतात. त्यामुळे या लोकांना मोठ्या ताणतणावाला तोंड द्यावे लागते. म्हणूनच ड्रायव्हर मंडळींसाठी कामाचे तास, आरोग्य, जेवणाच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा यांची नियमावली असणे व तीची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

खासदारांच्या सूचना-

नवले ब्रीज अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघात स्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच बोगद्यातून येतानाचा तीव्र उतार कमी करण्यासाठी तंज्ञांचा सल्ला घेऊन तसेच सेवा रस्ते आणि सेवा रस्त्यांना (आऊटलेट) येऊन मिळणारे इतर मार्ग शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केले पाहिजेत अशी सूचना केली.

गाडी चालवताना संयम महत्त्वाचा-

लोकप्रतिनिधींनी अशी दखल घेतल्यास व्यवस्था हलू शकते, हे उत्तम आहे. पण त्याच बरोबर खुद्द ड्रायव्हर मंडळींनी आपले वाहन संयमाने चालवणे गरजेचे आहे. राजस्थानमधील महिलेचा याच विषयावर प्रबोधन करणारा व्हिडिओ सद्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्या माध्यमातून समाजामध्ये जागृती घडत आहे. हे उत्तम असले तरी सर्वच घटकांनी आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडल्यास रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल. रस्ते प्रवास अटळ आहे म्हणूनच रस्ते प्रवासाशी निगडित प्रत्येक घटकाने काळजी घेणे अनिवार्य आहे, अन्यथा परिणाम अटळ आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीkatrajकात्रज