शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

GBS disease: गेल्या दहा वर्षांत पुणे स्मार्ट सिटी म्हणून किती विकसित झालं, हे तपासायला हवं;सुप्रिया सुळे संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:56 IST

सुप्रिया सुळे महापालिकेच्या भूमिकेवर केले प्रश्न उपस्थित

पुणे: खडकवासला आणि नांदेड परिसरात ‘जीबीएस’ (गिलन बॅरी सिंड्रोम) आजाराच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाण्यामुळे हा आजार वाढत असल्याचा संशय असून, प्रशासन यावर योग्य उपाययोजना करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.सुळे म्हणाल्या, "मी गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेसोबत पाठपुरावा करत आहे. पाणीपुरवठा सुरळीत आणि स्वच्छ असायला हवा. अनेक ठिकाणी एसटीपी प्लांट कार्यरत आहेत, तरीही प्रदूषण वाढतच आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष घालावे. यासाठी गोखले इन्स्टिट्यूटकडून अभ्यास अहवाल तयार करून घ्यायला हवा."सरकार अपयशी, निधी गैरवापराचा आरोपसुळे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवरही टीका केली. "करोडो रुपये सरकार पाठवते, मात्र ते कुठे जातात? याचा हिशोब नाही. मोठा हिस्सा सल्लागार आणि ब्रोकरकडे जातो. गेल्या दहा वर्षांत पुणे स्मार्ट सिटी म्हणून किती विकसित झालं, हे तपासायला हवं. समस्या वाढत असताना प्रशासन कुठे कमी पडतंय?" असा सवाल त्यांनी केला.आरोग्य मंत्र्यांना फोन, सरकारवर टीकासुळे पुढे म्हणाल्या, "मी आजच आरोग्य मंत्र्यांना फोन करून डिटेल रिपोर्ट मागवणार आहे. सरकार आणि महापालिका अधिकारी वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. लोकांचे आरोग्य धोक्यात घालणारे सरकार जबाबदार नाही का? फक्त एकच हॉस्पिटल का, इतर ठिकाणीही उपचार उपलब्ध व्हायला हवेत."पाणीपट्टी वाढवू देणार नाही, आंदोलनाचा इशारामहापालिकेच्या नियोजनावर नाराजी व्यक्त करत सुळे म्हणाल्या, "सरकार नागरिकांच्या सेवेसाठी आहे की फक्त दादागिरी आणि खंडणीसाठी? आम्ही पाणीपट्टी वाढवू देणार नाही. याविरोधात तीव्र आंदोलन करू."दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्री लवकरच राज्य सरकारसोबत प्रदूषण आणि दूषित पाण्याच्या मुद्द्यावर चर्चा करणार असून, त्याच वेळी सुळे यांनीही यावर सविस्तर माहिती घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळेHealthआरोग्यMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपात