शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निम्म्या शिक्षण संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत - सत्यपाल सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:57 IST

भारत तरुणांचा देश आहे, या तरुणांना दिशा देण्यासाठी दर्जेदार शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था असली पाहिजे. आज केवळ १० टक्के शिक्षण संस्था उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ४० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले.

पुणे : भारत तरुणांचा देश आहे, या तरुणांना दिशा देण्यासाठी दर्जेदार शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था असली पाहिजे. आज केवळ १० टक्के शिक्षण संस्था उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ४० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले.एमआयटीच्या वतीने आयोजित दुसºया नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या समारोपाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंग बोलत होते. या वेळी एशियन हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक राजीव सेठी, अलका सिंग, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. अगरवाल यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ. सिंग म्हणाले, ‘डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, पत्रकार यांसारखी समाजाचे आरोग्य सांभाळणारी माणसे आजकाल आत्महत्या करत आहेत, गुन्हे करत आहेत. हे सगळे पाहिल्यानंतर समाजाचे आरोग्य धोक्यात आल्याचे जाणवते. सृजनशीलता, संशोधन आणि आध्यात्म यांच्या संगमातून चारित्र्यसंपन्न नागरिक घडू शकतो. मेकॉलेने आदर्श भारतीय शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणली व गुलामगिरी निर्माण करणारी व्यवस्था आणली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आपण त्याला सावरू शकलेलो नाही.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ‘अनेक देश वैदिक शिक्षणाकडे वळत आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. सर्व प्रकारच्या शिक्षकांसाठी एखादी संस्था असली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’उच्च शिक्षित विद्यार्थी शिपाई पदासाठी!शिपाई पदासाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करीत आहेत, ही बाब चिंतेची आहे. आंतरशाखीय शिक्षणाचा उपयोग करून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. तशा प्रकारची धोरणे आखली पाहिजेत, असे मत राजीव सेठी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणे