शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

'मी कमाईसाठी कधीच नाटक केले नाही' दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या भावना

By श्रीकिशन काळे | Updated: November 25, 2024 13:54 IST

‘चित्रपटसृष्टीत रिस्क घेऊ नका, असे म्हटले जाते. जे लोकांना आवडतं तेच करा,’ अशी यशाची गुरुकिल्ली असते.

पुणे : ‘चित्रपटसृष्टीत रिस्क घेऊ नका, असे म्हटले जाते. जे लोकांना आवडतं तेच करा,’ अशी यशाची गुरुकिल्ली असते. पण मला ते मान्य नव्हते. मी माझे काम नुकसान होईल, हे गृहीत धरून केले. त्यामध्ये ‘वासनांध’, ‘गोची’ अशी प्रवाहाविरोधात जाणारी नाटकं केली. त्यावर प्रेक्षकांनी रोष व्यक्त केला. पण, मला धंदेवाईक नाटकं करायची नव्हतीच ! मी कमाईसाठी कधीच नाटक केले नाही. धंदेवाईक म्हणून तेच तेच प्रयोग करण्याचा किंवा सहाशे प्रयोग करण्याचा मला कंटाळा येतो, मला जे करायचे ते मी केले, त्यामुळे आज मी कृतकृत्य आहे,’’ अशा भावना ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या.मधुश्री पब्लिकेशन, वेस्टलॅन्ड बुक्सतर्फे प्रकाशित आणि अमोल पालेकरलिखित ‘ऐवज-एक स्मृतिबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी ‘एनएफएआय’मध्ये झाले. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, संध्या गोखले उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर कवी बालाजी सुतार यांनी पालेकर यांची मुलाखत घेतली.पालेकर म्हणाले, ‘मूठभर लोकांना जे खटकतं, जे बोलून दाखवायचे धैर्य नसते, ते म्हणजे सर्व गोष्टींवर रोडरोलर फिरवल्यासारखे आहे. विरोध, बंडखोरी हे खूप स्ट्राँग शब्द आहेत. मी जन्माला आलो तेव्हा बंडखोर नव्हतो. मला जे करायचे ते मी करणारच, तुम्हाला पसंत नसेल तर मी वेगळी वाट चोखाळली.मी सर्व क्षेत्रात हेच करत राहिलो. याचे धैर्य मला कुठून आलं, तर माझ्या आजूबाजूला खूप मोठे दिग्गज लोक होते. त्यांच्याकडून हे सर्व धैर्य आले. मी मराठीच्या कक्षेबाहेर गेल्यामुळे मी सर्वांशी बोललो आणि शिकलो. त्याच्यातून मी दुरस्थपणे, तटस्थपणे पाहण्याचे शिकलो.’मराठी, गुजरातीने काेणतं घोडं मारलंय हो !अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची तसदी कोणी घेत नाही. प्रेक्षक बघ्याची भूमिका घेतात. सेन्साॅर विरोधी भूमिकेला त्यांनी पाठिंबा द्यायला हवा. आज जाहीर भाषणं कशीही होतात, त्यावर मात्र कसलेही बंधन नसते. पण मराठी, गुजराती नाटकांवर सेन्सॉरशिप लावली जाते. यांनी कोणतं घोडं मारलंय हो !, असा थेट सवाल सई परांजपे यांनी सरकारला विचारला.सध्या लोकशाहीची घुसमट होतेय. सहिष्णुता आता संपुष्टात येत आहे. आरक्षण हे सामाजिक शाप होतोय. समाजात तेढ, दुजाभाव निर्माण झालाय. हा शिंदे म्हणजे मराठा, तो चित्पावन ब्राह्मण अशी लेबलं कधी लावली जात नव्हती, आता लावली जाताहेत. आपण माणसाला माणूस म्हणून कधी ओळखणार आहोत, असाही सवाल सई परांजपे यांनी उपस्थित केला.

अमोलच्या कलाविष्काराचे खूप पदर आहेत. प्रायोगिक नाट्यकर्मी, चित्रकार, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता असा विविध पैलू असलेला अमोल. यात सर्वांत अग्रणी ध्येयनिष्ठ, तत्त्वनिष्ठ, भला इसम म्हणजे अमोल. त्याला बंधनमुक्त राहण्याचा हव्यास आहे. राज्य प्रस्थापनेला त्याने टक्कर दिलीय. कलाकारांच्या हक्कावर आक्रमण झाले, तेव्हा त्याने त्याला विरोध केला.- सई परांजपे, ज्येष्ठ दिग्दर्शिका  

टॅग्स :PuneपुणेAmol Palekarअमोल पालेकरMarathi Movieमराठी चित्रपट