शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

विद्यार्थी अपघात विम्यासाठी मुख्याध्यापक आता घरोघरी

By admin | Published: September 25, 2015 1:13 AM

अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असताना, विमा योजनेसाठी येणारे प्रस्ताव हे कमी असल्याने आता मख्याध्यापक मयत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव तयार करणार आहेत.

पुणे : अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असताना, विमा योजनेसाठी येणारे प्रस्ताव हे कमी असल्याने आता मख्याध्यापक मयत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव तयार करणार आहेत. तसे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले असून, अहवाल मागविला असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगतिले. या संदर्भात अधिक माहिती अशी की, पहिली ते बारावीतील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ‘राजीव गांधी शालेय विद्यार्थी अपघात विमा’ ही योजना आहे. अपघातात मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना ७५ हजार रुपये मिळतात. मात्र, या योजनेविषयी पालकांना माहिती नसल्याने प्रस्तावच येत नाहीत. या योजनेचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी नुकतेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवून प्रस्ताव कमी असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. दररोज वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांवरून अपघातात विद्यार्थी मयत होत आहेत; मात्र प्रस्ताव कमी आहेत. त्यामुळे अशा अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांचा शोध घेऊन, त्यांना प्रस्ताव दाखल करण्यास प्रवृत्त करावे व सहकार्य करावे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कळविले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व तालुक्यांतील गटशिक्षण अधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठविले असून, कार्यवाही करावी; तसेच आज अखेरपर्य$ंतचा निरंक अहवाल पाठवावा, असे कळविले आहे. त्यामुळे आता मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखाना स्वत: प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्याचे वांजळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)