शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

Pune: शहरातील ओढे, झरे बंद केले तर पाण्याने जायचे कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 10:07 AM

महापालिका आणि नागरिक दोघांनी मिळून संवेदनशीलता दाखवून याविषयी काम करायला हवे...

- श्रीकिशन काळे

पुणे : शहरात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरते आणि रस्तेही पाण्याखाली जातात. त्यात प्रचंड नुकसान होते. शहरात सिमेंटीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. पावसाच्या पाण्याला वाहण्यासाठी असणारे मार्ग, झरे, ओढे, नाले बंद झाले आहेत. काही बुजविले आहेत. त्यामुळे पाण्याला भूगर्भात जाण्यासाठी पर्यायच राहिला नाही. परिणामी, रस्त्यावर पाणी येत असून, त्यामुळेच पूरस्थिती निर्माण होत आहे. महापालिका आणि नागरिक दोघांनी मिळून संवेदनशीलता दाखवून याविषयी काम करायला हवे, अशी अपेक्षा जलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे यांनी व्यक्त केली.

शहरात आता दरवर्षी पावसाळ्यात शहरात कुठे ना कुठे पूरस्थिती निर्माण होत आहे. त्याविषयी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, पाणलोट क्षेत्रात पडणारे पाणी हे अडविणे, जिरवणे आवश्यक असते. त्यातील काही पाणी वाहून जाते. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यापैकी ५ टक्के पाणी जमिनीत जिरत असते. जर तिथे तशी परिस्थिती असेल तरच ते जिरते, अन्यथा ते पाणी वाहून जाते. दुसरीकडे धरणे, बंधारे बांधून पाणी अडविले जाते. इतर जे पाणी आहे त्याला वाहायला रस्ता हवा असतो. नदी, ओहोळ, ओढा, झरे यातून पाणी वाहत असते. पण, हे मार्ग गेल्या काही वर्षांत बुजविले गेले आहेत. म्हणून पावसाचे पाणी रस्त्यावरच येत आहे. पाण्याला नैसर्गिक मार्ग राहिले नसल्याने पाण्याची पातळी वाढून रस्ते पाण्याखाली जात आहेत. हे आता सातत्याने होणार आहे. कारण शहरीकरणामुळे आपण पाण्याचे अनेक मार्ग बंद केले आहेत.

पुणे हे चढ-उतारावर वसलेले शहर आहे. इथे तलाव, नदी, ओढे, झरे आहेत. पण, त्यांची रचना शहरीकरणामुळे बदलली आहे. पुण्याच्या माथ्यावर म्हणजे पानशेत, मावळ, मुळशी या परिसरात दरवर्षी साधारणपणे दीड ते दोन हजार मिमी पाऊस पडतो. माथ्यावरून येणारे पाणी शहराकडेच येते आणि शहरात दरवर्षी साधारणपणे ८०० मिमी पाऊस पडतो. ही गोष्ट कोणी विचारातच घेत नाही, असे धोंडे यांनी सांगितले.

यावर उपाय काय?

प्रशासन व समाज संवेदनशील असायला हवा, जो आता नाही. दोघांची संवेदनशीलता परत आणायला हवी. जे आता नदीविषयी जागरूक आहेत, त्या संवेदनशील लोकांनी एक दबाव गट तयार करावा. जो पाण्याचे नैसर्गिक अस्तित्व जपेल. शहरातील नैसर्गिक स्रोत पुन्हा जीवंत केले पाहिजेत.

खूप वर्षांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर इमारती नव्हत्या. तेव्हा शहरभर ठिकठिकाणी २५६ झरे होते. आता मात्र ५६ देखील जीवंत राहिले नाहीत. सर्व गायब झाले आहेत. या झऱ्यांत जाणारे पाणी रस्त्यावरच राहत आहे. हे सर्व झरे पुनर्जीवित केले पाहिजेत.

- उपेंद्र धोंडे, भूजलवैज्ञानिक

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस