शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

महामार्ग पुणे-सातारा...प्रवासाचे मात्र तीन तेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 6:30 AM

महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता.

सूर्यकांत किंद्रे भोर : महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता. मागील एका वर्षात सुमारे ८८ अपघात झाले आहेत. त्यांत सुमारे ४७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्यान प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून अडथळ्यांची शर्यत पार करण्यासारखी अवस्था आहे.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम २००४मध्ये, तर सहापदरीकरणाचे काम २०१०मध्ये सुरू झाले. मात्र, मागील ७ वर्षांपासून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्याची रस्ते, सर्व्हिस मार्ग, पुलांची व भुयारी मार्गाची कामे अपूर्ण आहेत. या मार्गावर अपघातांची मालकी सतत सुरू असते. मागील ७ वर्षांत ६६८ अपघातांमध्ये ३४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, तरीही महामार्ग प्राधिकरणाला जाग आली नाही.महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या अनेक गावांना जाण्या-येण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असून ती अर्धवट आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वळवली आहे. याबाबतचे सूचनाफलक नाहीत. झेब्रा कॉसिंग नाहीत. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यांत पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते साताºयादरम्यानच्या १४० किमीच्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन केले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात २००४मध्ये झाली.काम पूर्ण झाल्यावर २०१०मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डीबीएफओटी तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्र ा कंपनीला १७२४ कोटी रुपयांना ठेका दिला. त्याबदल्यात खेड-शिवापूर येथील व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली. या टोलमधून दर वर्षी महामार्ग प्राधिकरणाला ९० कोटी रुपये प्रिमियम मिळणार आहे. यात दर वर्षी ५ टक्के वाढ होणार.सदर रोडचे काम २०१३पर्यंत पूर्ण करण्याची अट होती; मात्र २०१७ संपायला आले तरीही अद्याप काम अपूर्णच आहे आणि काम पूर्ण होण्याआधीच ४० टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. मात्र, ना रस्ता चांगला, ना सुखकर प्रवास आणि तरीही टोलवाढीचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागत आहे. महामार्गावर अत्यंत रेंगाळलेल्या अवस्थेत कामे असल्याने वाहतुकीला अडथळा तर होत आहेच; शिवाय रात्रीअपरात्री लहानमोठे अपघातही होत आहेत.सूर्यकांत किंद्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कभोर : महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता. मागील एका वर्षात सुमारे ८८ अपघात झाले आहेत. त्यांत सुमारे ४७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्यान प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून अडथळ्यांची शर्यत पार करण्यासारखी अवस्था आहे.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम २००४मध्ये, तर सहापदरीकरणाचे काम २०१०मध्ये सुरू झाले. मात्र, मागील ७ वर्षांपासून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्याची रस्ते, सर्व्हिस मार्ग, पुलांची व भुयारी मार्गाची कामे अपूर्ण आहेत. या मार्गावर अपघातांची मालकी सतत सुरू असते. मागील ७ वर्षांत ६६८ अपघातांमध्ये ३४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, तरीही महामार्ग प्राधिकरणाला जाग आली नाही.महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या अनेक गावांना जाण्या-येण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असून ती अर्धवट आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वळवली आहे. याबाबतचे सूचनाफलक नाहीत. झेब्रा कॉसिंग नाहीत. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यांत पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते साताºयादरम्यानच्या १४० किमीच्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन केले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात २००४मध्ये झाली.काम पूर्ण झाल्यावर २०१०मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डीबीएफओटी तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्र ा कंपनीला १७२४ कोटी रुपयांना ठेका दिला. त्याबदल्यात खेड-शिवापूर येथील व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली. या टोलमधून दर वर्षी महामार्ग प्राधिकरणाला ९० कोटी रुपये प्रिमियम मिळणार आहे. यात दर वर्षी ५ टक्के वाढ होणार.सदर रोडचे काम २०१३पर्यंत पूर्ण करण्याची अट होती; मात्र २०१७ संपायला आले तरीही अद्याप काम अपूर्णच आहे आणि काम पूर्ण होण्याआधीच ४० टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. मात्र, ना रस्ता चांगला, ना सुखकर प्रवास आणि तरीही टोलवाढीचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागत आहे. महामार्गावर अत्यंत रेंगाळलेल्या अवस्थेत कामे असल्याने वाहतुकीला अडथळा तर होत आहेच; शिवाय रात्रीअपरात्री लहानमोठे अपघातही होत आहेत.