शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

‘हिंदी’ भाषेला राष्ट्रभाषा म्हणून अजूनही अधिकृत दर्जा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 17:11 IST

राज्यघटनेत उल्लेख नसतानाही शासकीय अध्यादेशात हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून उल्लेख

पुणे : ‘हिंदी’ भाषेला राष्ट्रभाषा म्हणून अजूनही अधिकृत दर्जा मिळालेला नाही. देशात २२ राष्ट्रीय भाषा आहेत, त्यात हिंदीचा समावेश आहे. मात्र, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने काढलेल्या अध्यादेशात ‘हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे’ असा पहिल्याच वाक्यात उल्लेख करून हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जाच बहाल करून टाकला आहे, त्यामुळे सर्वस्तरातून शासनाच्या अज्ञानावर टीकेची झोड उठवली जात आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र शासनाच्या समर्थनार्थ सूर आळवला असून, महाराष्ट्राचा नागरिक या नात्याने विचारले तर हिंदी राष्ट्रभाषा करायला हरकत नाही तसा केंद्र सरकारने प्रयत्न करावा, अशी मागणी केली आहे. ‘हिंदी’ ही राष्ट्रभाषा असल्याबाबतचा गैरसमज जसा समाजात आहे तसा तो राजकीय नेत्यांमध्येही आहे. देशात सर्वाधिक बोली बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदीचा समावेश आहे. पण तिला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळालेला नाही.

हिंदीबाबत नेत्यांमध्येही अज्ञान

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आली आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदी साहित्याच्या उन्नतीसाठी आणि उत्तेजनासाठी राज्यात हिंदी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे, असे शासकीय अध्यादेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री या अकादमीचे अध्यक्ष आहेत. सांस्कृतिक कार्य सचिव हे सदस्य तर, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सहसंचालक हे समितीचे सदस्य सचिव आहेत. डॉ. शीतल प्रसाद दुबे समिताच्या कार्याध्यक्ष असून त्यांच्यासह हिंदी साहित्य आणि अनुवाद क्षेत्रातील २८ तज्ज्ञांचा समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

इंग्रजी व हिंदी शासकीय भाषा

ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी म्हणाले, राज्यघटनेनुसार हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. सर्व भाषा समान आहेत, असेच राज्यघटनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. हिंदी ही राज्यकारभारासाठी इंग्रजीबरोबर वापरण्याची भाषा असा कायदा १९५२ मध्ये झाला होता. काही वर्षांत इंग्रजीची जागा हिंदी भाषेने घ्यावी, अशी अपेक्षा होती. परंतु, ते होऊ शकले नाही. त्यामुळे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषा शासकीय कामाच्या कारभारासाठी उपयोगात आणाव्यात, असा कायदा १९७२ मध्ये करण्यात आला होता.

केंद्राने हिंदी ही राष्ट्रभाषा करावी

आपण जागतिक भाषा म्हणून इंग्रजीचा तर राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी आणि मातृभाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख करतो. पण मराठी-इंग्रजीबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. या दोन्ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. मात्र राष्ट्रभाषेबद्दल तशा प्रकारे केंद्र सरकारने हिंदी राष्ट्रभाषा जाहीर केलेली नाही. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांची याबाबत वेगळी भूमिका आहे. परंतु महाराष्ट्राचा नागरिक या नात्याने विचारले तर हिंदी राष्ट्रभाषा करायला हरकत नाही. तसा केंद्र सरकारने प्रयत्न करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

आपला देश बहुभाषिक, राष्ट्रभाषेला स्थान नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले यांनीही हिंदीला राष्ट्रभाषा असे म्हटले. लोकांनी चूक लक्षात आणून दिली तरीही सुधारणा करण्यात आलेली नाही. हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा समज मराठी माणसांमध्ये करून देण्यात आला आहे. आपल्याकडे राष्ट्रभाषा ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही, कारण आपला देश बहुभाषिक आहे. आपल्याकडे दोन कार्यालयीन राजभाषा आहेत, त्यात हिंदीचा समावेश आहे. मात्र जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले जात आहेत. - प्रकाश निर्मळ, भाषाप्रेमी

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारSocialसामाजिक