शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाराष्ट्रात वार्षिक परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवा; मुख्याध्यापक महामंडळाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:40 IST

एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आणि किमान ५ विषयाचा कार्यभार त्यानुसार ३५० ते ४०० उत्तरपत्रिका ४ ते ५ दिवसांत तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही

पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने संकलित चाचणी दोन/वार्षिक परीक्षेचे दि. २५ एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक तयार केले आहे. शेवटचा पेपर दि. २५ ला ठेवला आहे. त्यानंतर चार ते पाच दिवसांत उत्तरपत्रिका तपासणे, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तके लिहिणे, संचयी नोंदपत्रक लिहिणे आदी कामे चार ते पाच दिवसांत होऊ शकत नाहीत. त्यामुळे इयत्ता पाचवी ते नववीसाठीच्या संकलित मूल्यमापन चाचणी (पॅट) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून ही परीक्षा दि. ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवावी, अशी मागणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे केली आहे. तसे निवेदनही महामंडळाने ‘एससीईआरटी’च्या उपसंचालक कमलादेवी आवटे यांना गुरुवारी दिले.

राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन केले आहे. त्यानुसार २०२४-२०२५ मध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी एक झालेली आहे. संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जाहीर केले आहे. संकलित चाचणी २ आणि वार्षिक परीक्षेचे दि. २५ एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक तयार करून पाठविले आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या म्हणण्यानुसार, माध्यमिक शाळेत विषयनिहाय शिक्षक असतात. एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आणि किमान पाच विषयाचा कार्यभार त्यानुसार ३५० ते ४०० उत्तरपत्रिका चार ते पाच दिवसांत तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. यातच मराठवाडा, विदर्भ व इतर जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये कडक ऊन, पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करून एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य होणार नाही. प्रत्येक वर्षी १० ते १२ एप्रिलपर्यंत परीक्षा संपते. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाबरोबरच उपचारात्मक अध्यापन, सुंदर हस्ताक्षर वर्ग, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, पोहणे आदी विविध कलाकौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी शाळेमध्ये छंदवर्गाचे आयोजन केले जाते. दि. २५ एप्रिलपर्यंत परीक्षा ठेवल्याने हे वर्ग घेता येणार नाहीत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करून ‘पॅट’ची परीक्षा दि. ८ ते १२ एप्रिलदरम्यान घेण्यात यावी. त्यापूर्वी शाळेला इतर विषयांची परीक्षा घेण्याची परवानगी शाळास्तरावर द्यावी, ही विनंती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि सचिव नंदकुमार सगर यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र