शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

आचारसंहितेचा भंग हाेताेय ? अशी करा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 16:56 IST

निवडणुक आयाेगाने सी व्हिजील हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सामान्य नागरिक देखील आचारसंहिता भंगच्या तक्रारी नाेंदवू शकणार आहेत.

पुणे : निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता देशभरात लागू झाली. या आचारसंहितेच्या काळात आचारसंहितेच्या नियमांचा भंग हाेईल अशी कुठलिही गाेष्ट उमेदवारांकडून करायची नसते. परंतु अनेकदा या काळात आचारसंहितेचा भंग हाेत असताे. त्यासाठी आता निवडणुक आयाेगाने सी व्हिजील हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सामान्य नागरिक देखील आचारसंहिता भंगच्या तक्रारी नाेंदवू शकणार आहेत. 

आत्तापर्यंत देशभरात आचारसंहिता भंग झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात कुठल्याही सरकारी वाहनांचा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना वापर करता येत नाही. त्याचबराेबर कुठल्याही नवीन याेजना जाहीर करण्यात येत नाही. आक्षेपार्ह पाेस्टर्स, बॅनर लावता येत नाहीत. तसेच मतदारांना पैसे वाटणे, इतर प्रलाेभणे दाखवता येत नाहीत. यंदा पहिल्यांदाच निवडणुक आयाेगाकडून सी व्हिजील अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे सामान्य नागरिकांना देखील तक्रार दाखल करता येणार आहे. आचारसंहितेचा कुठे भंग हाेत असेल तर या अ‍ॅपवर नागरिक ते सांगणारा फाेटाे, व्हिडीओ आणि माहिती टाकू शकता. या तक्रारींची शहानिशा करुन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या असून त्यात पाेलिस, निवडणुक अधिकारी तसेच न्यायाधिशांचा देखील समावेश आहे. तक्रार मिळाल्यानंतर 15 मिनिटात ही टीम घटनास्थळी दाखल हाेते. घटनेची शहानिशा करुन 100 मिनिटांच्या आत केस निकाली काढायची असते. 

दरम्यान या अ‍ॅपचा गैरवापर देखील नागरिकांकडून हाेताना दिसत आहे. काही नागरिक स्वतःचे फाेटाे या अ‍ॅपवर अपलाेड करत आहेत. त्याचबराेबर इतर ठिकाणांचे देखील फाेटाे अपलाेड करत आहेत. त्यामुळे यंत्रणेची तारांबळ उडत आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपचा वापर करुन सर्वाधिक तक्रारी या पुणे मतदारसंघात नाेंदविण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर याेग्य ती कारवाई देखील करण्यात आली आहे. पुण्यात या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयात एका स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली असून तिथून निगराणी ठेवण्यात येत आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान