शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

उमेदवाराने संपत्ती मिळवली कशी? तेही जाहीर करायला लावा, ग्राहक पंचायतीचे निवडणूक आयोगाला पत्र

By राजू इनामदार | Updated: October 8, 2024 16:12 IST

संपत्ती जाहीर केल्यावर कामधंदा, व्यवसाय नसलेल्या उमेदवारांची कोट्यवधींची उड्डाणे यातून दिसतात

पुणे: निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने आपली संपत्ती जाहीर करावी असा नियम करणाऱ्या भारतीय लोकशाहीचे जगात कौतूक होते, मात्र आता ही संपत्ती कशी मिळवली तेही जाहीर करण्याचे बंधन घालावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे. आवश्यकता भासल्यास संसदेने यासंबधीचे विधेयक तयार करून मंजूर करावे असेही पंचायतीने म्हटले आहे.

पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष विलास लेले यांनी सांगितले की सन १९८५ मध्ये तत्कालीन निवडणुक आयुक्त टी.एन. शेषण यांनी निवडणूक नियमांमध्ये ही सुधारणा केली. तेव्हापासून प्रत्येक उमेदवाराला आता आपली संपत्ती जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यातून अनेक गोष्टी उघड होतात. काहीही कामधंदा, व्यवसाय नसलेल्या उमेदवारांची कोट्यवधींची उड्डाणे यातून दिसतात. व्यवसाय म्हणून समाजकार्य टाकले जाते. तरीही त्यांची संपती कोट्यवधी रूपयांची असते. करोडो रूपयांचे दागदागिने असतात.

संपत्ती जाहीर केली म्हणजे संपले असा हा प्रकार आहे. त्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे ही संपत्ती आली कोठून? कोणत्या उद्योगातून कमवली? त्यात वाढ कशी झाली? असाही एक स्वतंत्र रकाना उमेदवारी अर्जात करावे असे पंचायतीने आयोगाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. पंचायतीचे पुणे महानगर अध्यक्ष विजय सागर तसेच सदस्य रविंद्र वाटवे, प्रकाश राजगुरू, सुनील नाईक, अंजली देशमुख, वीणा दीक्षित, राजश्री दीक्षित, विजया वाघ, अंतली करंबळेकर, अंजली फडणीस, माधुरी गानू यांच्याही स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत. हा बदल केला तर भारतीय राजकारणात खऱ्या अर्थाने सच्छिल व सज्जन व्यक्ती येतील. राजकारणाचा पोत सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा पंचायतीने व्यक्त केली आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणMONEYपैसाbusinessव्यवसाय