शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिक्षणाचे काम अशैक्षणिक कसे? शिक्षकांच्या बहिष्कारावर केसरकरांचा सवाल

By प्रशांत बिडवे | Updated: October 16, 2023 18:30 IST

शिक्षणासाठी असलेले काम अशैक्षणिक असू शकत नसल्याचे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले....

पुणे : शाळाबाह्य घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे आहे. यामध्ये शाळा हा केंद्रबिंदू असणार आहे. शिक्षक त्यापासून वेगळा हाेउन चालणार नाही. यात शिक्षकांना फार माेठे काम नाही. जाे शाळाबाह्य विद्यार्थी राहिला त्याला आपल्याला शिक्षित करायचे आहे. शिक्षकाने शिकवताना प्रत्येक व्यक्तीला शिकविले पाहिजे. फक्त मुलांना शिकविणे इथपर्यंत ते मर्यादित असू शकत नाही. त्यामुळे शिक्षणासाठी असलेले काम अशैक्षणिक असू शकत नसल्याचे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

केसरकर म्हणाले, नवभारत साक्षरता अभियान देशात यशस्वी हाेत असेल तर महाराष्ट्रात का नाही? याचा विचार करावा लागणार आहे. शिक्षक संघटनांचे काही वेगळं मत असेल तर ते आमच्यापर्यंत आणा. शिक्षण अधिकाऱ्यांनी शासन निर्णय काळजीपूर्वक वाचावा आणि त्या संदर्भात शिक्षक संघटनांशी बाेलावे, शिक्षकांशी वैयक्तिक चर्चा करावी.

लवकरच शिक्षक भरतीला सुरूवात -

राज्यात २३ झेडपीचे राेस्टर तपासणी पूर्ण झाली आहे त्यानुसार पद भरतीला सुरूवात केली जाईल. त्यानंतर अनुदानित शाळांमध्ये रीक्त पदेही भरण्यात येणार आहेत. त्यामुळे अनुदानित शाळांनीही राेस्टर तपासणी पूर्ण करून घ्यावी असे शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल म्हणाले.

फेस रिकग्निशनव्दारे विद्यार्थ्यांची हजेरी

आगामी काळात विद्यार्थ्यांची हजेरीसाठी शाळांमध्ये वेब कॅमेरा लावण्यात येणार आहे. फेस रिकग्नीशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचण्यास मदत हाेईल अशी माहिती केसरकर यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDipak Kesarkarदीपक केसरकर