शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मंगळावर मानवी मोहीम

By admin | Published: May 31, 2017 3:01 AM

मानवी वास्तव्यासाठी पृथ्वीनंतर मंगळ ही सर्वांत सुरक्षित जागा आहे. मंगळावर पाणी, कार्बनडायआॅक्साइड अशा गोष्टी

पुणे : ‘मानवी वास्तव्यासाठी पृथ्वीनंतर मंगळ ही सर्वांत सुरक्षित जागा आहे. मंगळावर पाणी, कार्बनडायआॅक्साइड अशा गोष्टी मूलभूत प्रमाणात असल्याने जगामधील काही कंपन्यांनी मानवाला मंगळावर पाठवण्याची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. नासादेखील इस्रोच्या सहकार्याने मंगळावर मानवी मोहीम आखण्याच्या तयारीत आहे’, असे सुतोवाच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक यांनी मंगळवारी केले. इस्रोच्या चांद्रयान आणि मंगळयान या मोहिमांमुळे अंतराळ क्षेत्रात संपूर्ण जग भारताकडे आदराने पाहत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.पुणे मराठी ग्रंथालयातर्फे डॉ. श्रीकांत कार्लेकर यांच्या ‘पृथ्वीजिज्ञासा’ या पुस्तकास स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार व अरुण करमकर यांच्या ‘पोलादी राष्ट्रपुरुष’ या पुस्तकास चेतना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. नाईक बोलत होते. धनंजय बर्वे, अरुण करमरकर, श्रीकांत कार्लेकर, दिलीप ठकार, डॉ. अनुजा कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. नाईक म्हणाले, ‘प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज यांनी काही दिवसांपूर्वी पृथ्वी शंभर वर्षे टिकेल, असे विधान केले आहे. त्यामध्ये कल्पनाविलास किंवा रंजकता नसून त्यामागे अभ्यासपूर्ण संशोधन आहे. पुढील शंभर वर्षांत मनुष्याला इतर ग्रहांचा आधार घ्यावा लागू शकतो. पृथ्वीनंतर मंगळ ग्रह मनुष्यासाठी सर्वांत सुरक्षित जागा आहे. तेथील तापमान, वातावरण पृथ्वीशी मिळतेजुळते आहे. त्यामुळेच भविष्यात मंगळाकडे पर्यायी जग म्हणून पाहिले जाईल.’‘चंद्र हा उपग्रह पृथ्वीच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे. परंतु, तेथील तापमान आणि वातावरणाचा विचार केला तर मनुष्याच्या दृष्टीने ते घातक आहे. त्यानंतर सर्वांत जवळ शुक्र आहे. तेथील तापमानही पृथ्वीच्या प्रमाणात खूप जास्त आहे, असेही ते म्हणाले.अरुण करमरकर आणि श्रीकांत कार्लेकर यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विषद केली. ‘सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्याकडे भारतीय राजकारणाने अनेक वर्षे दुर्लक्ष केले आहे. त्यांचे कार्य लोकांसमोर यावे, या हेतूने हे पुस्तक लिहिले असल्याचे’ करमरकर यांनी सांगितले. पृथ्वीला मनुष्याने समजून घेण्याची गरज असल्याचे कार्लेकर यांनी नमूद केले. चारूदत्त निमकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.