शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मी सैन्याच्या नव्हे, व्यवस्थेच्या विरोधात : शर्मिला इरोम यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:18 IST

सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो.

ठळक मुद्देकाश्मीरमधील महिलांसाठी काम करणार

 पुणे : ‘लोकशाहीतील सरकार लोकांचेच असले पाहिजे. मी राष्ट्रविरोधी कृत्याचे समर्थन कधीच करणार नाही. लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांच्या समस्यांचा बारकाईने विचार व्हायला हवा. सीमाभागात आस्फा कायद्याचे भीषण परिणाम भोगावे लागतात. सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो. मी सैन्याच्या नव्हे तर व्यवस्थेच्या विरोधात आहे’, अशी स्पष्टोक्ती मणिपूर येथील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या शर्मिला इरोम यांनी दिली. काँग्रेस किंवा भाजपपेक्षाही मला लोकांचे सरकार आवडते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.     जगातील सर्वात जास्त काळ उपोषण केलेल्या मणिपूर राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री ‘आयर्न लेडी’ शर्मिला इरोम यांची प्रगट मुलाखत महावीर जैन विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. युवराज शहा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शर्मिला यांचे पती दसमंड कुतिनाहो, प्रमुख पाहुणे म्हणून विद्या बाळ, असीम सरोदे, डॉ. योगेश वाठारकर, संजय शहा, सरहदचे संजय नहार उपस्थित होते. ‘सरहद’ तफे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    शर्मिला इरोम म्हणाल्या, ‘आंदोलनाच्या काळात मला खूप नैराश्य येत होते. राजकारणात गेल्याने विश्वासार्हता कमी झाली, असे मला वाटत नाही. मी आजवर मोदींना भेटले नाही. मला सरहद संस्थेने सदिच्छा दूत नेमले असून काश्मीरमधील महिलांसाठी काम करणार आहे. मी काश्मीरच्या लोकांना प्रेम देऊ इच्छिते. एकीकडे काश्मीर सरकार तर दुसरीकडे पाकिस्तान अशा दोन्ही बाजूंनी काश्मीरमधील सर्वसामान्य भरडले जात आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मला खूप काम करायचे आहे. सरकार आणि लष्कर दहशतवादाविरोधातील कारवाईसाठी अब्जावधी रुपये खर्च करतात. मात्र, सर्वसामान्यांचे हाल, शेतक-यांच्या आत्महत्या हे भीषण वास्तव स्वीकारुन त्यावर मार्ग काढायला सरकार पुढे येत नाही.’‘भारतीय समाजात आजही स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा कृत्यांविरोधात कडक कारवाई होऊन सामान्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.विद्या बाळ म्हणाल्या, ‘सर्वसामान्य लोक कायमच व्यवस्थेचे बळी ठरतात. शर्मिलाने १६ वर्षे उपोषण करुनही निष्ठुर, निर्दयी सरकारला कसलाही फरक पडला नाही. उपोषण राहून मरण्यापेक्षा जिवंत राहून काम करणे गरजेचे आहे, हे पटल्याने तिने मानवी हक्कांसाठी लढा उभारला आहे. सध्या समाजाची अवस्था संवेदनाहीन झाली आहे. या समाजाविरोधात लढा उभारणारी इरोम ही जिद्दीचे प्रतीक आहे.’--------------------मोदी सरकार मानवाधिकारासाठी काम करते का, असे विचारले असता इरोम म्हणाल्या, ‘लोकांनी सरकार निवडून दिले आहे. त्यामुळे मोदी कसे आहेत, त्यांचे सरकार कसे आहे, हे जनताच ठरवेल. माझा कोणत्याही पक्षाच्या नव्हे, तर लोकांच्या सरकारवर जास्त विश्वास आहे. आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून इतरांचा विचार केला पाहिजे.’

 

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाSanjay Naharसंजय नहारVidya Balविद्या बाळ