शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

आठ बाय दहा च्या खोलीत राहिल्याने पूरग्रस्तांच्या प्रश्नांची जाण : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 20:48 IST

कोथरूड विधानसभा मतदार संघ व पानशेत पूरग्रस्त समिती यांच्या संयुक्त विद्यामाने पूरग्रस्ताचे प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल महसूल व मदत पूर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील व पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्यांनी अापल्या अाठवणींना उजाळा दिला.

पुणे : मी स्वत: वडील, सख्खी, सावत्र आई आणि सात बहिणी असे तब्बल अकरा लोकांचे कुटुंब मुंबईत आठ बाय दहाच्या खोलीत अनेक वर्षे राहिलो आहे. आमच्याकडे पाहुणे आल्यानंतर तुम्ही कसे झोपता असा प्रश्न करत, असे भावनीक होत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पानशेत पूरग्रस्त १० बाय १२ च्या खोलीत कसे राहत असतील यांची पूर्ण जाणीव आपल्या असल्याचे सांगितले. यामुळेच पानशेतसह संपूर्ण राज्यातील विविध प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपला पुढाकार असल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले.

    कोथरूड विधानसभा मतदार संघ व पानशेत पूरग्रस्त समिती यांच्या संयुक्त विद्यामाने पूरग्रस्ताचे प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल महसूल व मदत पूर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील व पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी , नगरसेविका माधुरी सहस्रबुधे , मंजुषा खर्डेकर, जंयत भावे, दिपक पोटे, राजेंद्र शिळिमकर, पुरग्रस्ताचे प्रश्न सोडविणारे मंगेश खराटे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले की, राज्यात सत्तेवर आल्यावर प्रथम आपल्याला पाच वर्षांत काय-काय कामे करायचे हे निश्चित केले व तसे लिहून देखील काढले. यामध्ये राज्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हे एक काम होते. काही प्रश्न मार्गी देखील लावले. 

    आमचे सरकार सर्वसामान्याचे सरकार असून, त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही गेल्या चार वर्षांत अनेक निर्णय घेतले. यामध्ये सर्वसामान्यांसाठी जाचक असलेले अनेक ब्रिटीश कालीन कायदे रद्द केले.  आकारी पड जमीन, क्लास वनच्या जमिनीचे क्लास टूमघ्ये रुपातर, गावठाण हद्द वाढीचा निर्णय अनेक निर्णय घेतले. यामध्ये सध्या राज्यातील अनेक प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी देणे शक्य नाही. यामुळे सध्याच्या दरानुसार तब्बल पाच पट अधिक पैसे देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला असून, यासाठी तब्बल १ लाख कोटी रुपयांचा भूर्दंड शासनाला सहन करावा लागणार आहे. कायदे करण्यासाठी आपण शासना सोबत भांडतो, परंतु कायदे झाल्यानंतर ते पाळण्याची जबाबदारी देखील आपली असल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोपरे, शिवणेचा प्रश्न देखील सोडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पाटील यांनी येथे स्पष्ट केले. २५ वर्षांनंतरही किल्लारी भूकंपग्रस्त उपेक्षितकिल्लारी भूकंपग्रस्ताचे अनेक प्रश्न २५ वर्षांनंतर देखील सुटलेले नाहीत. त्यावेळी राज्याचे सत्ताकेंद्र पुण्यात होते. त्यांना देखील हे प्रश्न मार्गी लावता आले नाही. असा टोला पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे नाव न घेता लावला. परंतु गेल्या चार वर्षांत राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनात पक्षाने प्रकल्पग्रस्ताचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून, आगामी काळात देखील अधिकाधिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाnewsबातम्या